येवला ( जि.नाशिक) : अधिकारी मनमानी करत असतील तर त्याला वरिष्ठांकडे दात मागून नक्कीच चाप लावता येऊ शकतो हे निमगाव मढ येथील माजी सरपंच नवनाथ लभडे यांनी दाखविले आहे.आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चुकीच्या पद्धतीने प्रभाग रचना व आरक्षण सोडत काढल्याचे त्यांनी अभ्यासपूर्णतेने मांडत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितल्यानंतर या चुकीच्या प्रभाग रचना व आरक्षणाला ब्रेक लावला गेला आहे. आता जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी येथील प्रभाग निहाय लोकसंख्या निश्चित करून सुधारित प्रभाग रचना व आरक्षणाचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
चुकीच्या प्रभाग रचना व आरक्षणाला जिल्हाधिकार्याकडून ब्रेक!
येथील जागृत कार्यकर्ते असलेल्या लभडे यांनी यापूर्वीचे तहसीलदारांकडे विविध स्वरूपाच्या तक्रारी केल्या असून त्याची दखल घेतली गेली नसल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्र्याकडेही तक्रारी केल्या आहेत तसेच येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ठरविलेली प्रभाग रचना व आरक्षण संदर्भातही लभडे यांनी दाद मागितली होती.त्यानुसार त्यांना थेट जिल्हाधिकाऱ्यांकडून न्याय मिळाला आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रभाग रचना आरक्षण कार्यक्रम २० डिसेंबर २०१९ पासून सुरू करण्यात आला होता. त्यानुसार ७ फेब्रुवारी रोजी प्रभाग रचनेवर हरकती मागविण्यात आल्या होत्या. निमगाव मढ येथील ग्रामपंचायतीची प्रभाग रचना चुकीची झाल्याचे लभडे यांनी उपविभागीय अधिकाऱ्याकडे अपील दाखल केले होते.त्यावर २० फेब्रुवारी रोजी सुनावणी होऊन त्यामध्ये प्रभाग रचना दुरुस्त करण्याच्या सूचना उपविभागीय अधिकारी यांनी दिल्याने मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांनी आपल्या पद्धतीने अहवाल सादर केले.
नव्याने प्रस्ताव पाठविण्याचे मांढरेचे आदेश
मात्र लभडे यांचे समाधान झाले नव्हते. प्रांताधिकार्यांच्या आदेशाने पुन्हा नायब तहसीलदार, निवडणूक निर्णय अधिकारी, ग्रामसेवक, आणि तलाठी यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन आहे त्या परिस्थितीचा अहवाल तयार केला. तो अहवाल मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणे आवश्यक असते, असे सांगून स्थळ पाहणी केल्यानंतर प्रत्यक्ष स्थळी परिशिष्ट अ तयार करण्यात आले. परंतु परिशिष्ट ब मध्ये लोकसंख्येची चुकीची आकडेवारी भरल्याने परिशिष्ट अ चा विचार न घेता, चुकीची आकडेवारी दर्शविली. आणि सदर आहवाल जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला.कोरोना परिस्थितीमुळे या कार्यक्रमाला स्थगिती देण्यात आली होती. परंतु राज्य निवडणूक आयोगाने नव्याने कार्यक्रम जाहीर केला.
त्यानुसार २७ तारखेला या प्रभाग रचनेच्या हरकतीवर अपीलकार आणि प्रशासनाने सादर केलेल्या कागदपत्रांचा विचार करून हरकतदार यांनी घेतलेले मुद्दे आणि प्रशासनातील व्यक्तींनी सादर केलेले मुद्दे विसंगत असल्याने, प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता असल्याकारणाने तात्काल प्रभाग रचना व आरक्षण दुरुस्त करून,दुरुस्ती अहवाल पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिले आहेत.
“नागरिकांनी जागृतपणे गावाचा कारभार पाहिला तर मनमानी कारणाऱ्या अधिकारी-कर्मचार्याच्या अनेक चुका सापडतील.येथील तलाठी यांनी प्रभाग रचनेबाबत चुकीची माहिती पुरविली.त्यामुळे प्रभात रचना चुकली अन जोडीनेच आरक्षणही..यामुळे शासकीय यंत्रणेला,ग्रामस्थांना अन आम्हाला त्रास झाला. परंतु न्याय मिळाला यामध्ये समाधान आहे.- नवनाथ लभडे, माजी सरपंच, निमगाव मढ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.