ramu borse.jpg 
नाशिक

मुलाला उच्चशिक्षित करण्याची 'त्यांची' इच्छा अपूर्णच...काळ असा आला की...मुलगाच

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (साकोरा) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे नाशिकहून आई-वडिलांना शेतीकामासाठी मदत करण्यासाठी घरी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा विजेच्या धक्‍क्‍याने मृत्यू झाला. रामू रवींद्र बोरसे असे मृताचे नाव आहे. ही घटना वाघदरा शिवारात रविवारी (ता.12) सायंकाळी घडली. 

अशी आहे घटना

रामू बोरसे (वय 22) नाशिकला बीसीएस कॉम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. सध्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे तो आपल्या घरी आला होता. वाघदरा शिवारात आई-वडिलांना तो शेतीत मदत करीत होता. रविवारी कांदा पिकाला पाणी भरणे सुरू होते. त्याचा विजेच्या तारेवर पाय पडल्याने त्याला विजेचा धक्का बसला. उपचारासाठी त्याला नांदगाव ग्रामीण रुग्णालयात घेऊन जात असताना, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही वार्ता गावात पसरताच शोककळा पसरली. शेतीव्यवसाय करून मुलाला उच्चशिक्षित करण्याची वडिलांची इच्छा अपूर्ण राहिल्याने बोरसे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT