Death esakal
नाशिक

नाशिक : लग्नाचा बस्ता उरकून परतताना अपघातातील दुसऱ्याचा मृत्यू

युनूस शेख

जुने नाशिक : लग्नाचा बस्ता उरकून परतताना झालेल्या अपघातात वसंत शंकर मांडोळे (५५, रा. पाथर्डी फाटा) यांचा मृत्यू झाला होता. अन्य दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना राजीव शंकर मांडोळे पाटील (४७, रा. कामटवाडे अंबड) यांचा बुधवारी (ता.१७) मृत्यू झाला.

रवींद्र शंकर मांडोळे (५१, रा. सिडको) यांचा मुलगा गणेश मांडोळे याच्या लग्नाच्या बस्त्यासाठी रवींद्र यांच्यासह त्यांचे तीन भाऊ देविदास शंकर मांडोळे, राजू शंकर मांडोळे, मृत वसंत शंकर मांडोळे असे चौघे शनिवारी (ता.१३) सकाळी जळगाव पारोळा येथे गेले होते. उड्डाणपुलावरून जळगावच्या दिशेने सिडकोकडे जात असताना द्वारका ट्रॅक्टर हाऊस परिसरात रस्त्यात उभा असलेला कंटेनर (एनएल- ०१- एए-९०३४) वर त्यांची अल्टो कार (एमएच- १५- एफएफ- ९४५८) जाऊन आढळली. त्यात चौघेजण जखमी झाले. उपचार सुरू असताना वसंत मांडोळे यांचा मृत्यू झाला होता. देविदास आणि राजीव गंभीर जखमी असल्याने कुटुंबीयांनी त्यांना खासगी रुग्णालयात हलविले होते. उपचारादरम्यान राजीव मांडोळे पाटील यांचादेखील मृत्यू झाला. तीन दिवसापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. भद्रकाली पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Farmers Protest : गुजरातमध्ये शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण; ४७ जणांना अटक, १००० हून अधिक आंदोलकांविरुद्ध गुन्हे दाखल

Shravan 2025 Food Avoid: श्रावणात नॉन व्हेज टाळताय? मग प्रथिनांची कमतरता भरून काढण्यासाठी 'या' 5 शाकाहारी पदार्थांचा करा आहारात समावेश

Latest Maharashtra News Updates : आळंदीत रविवारी संत भेटीचा सोहळा, वारकरी संप्रदायाला अनुभवायला मिळणार दुग्धशर्करा योग

Mumbai Crime : मोबाईलवर गेम खेळताना पाहून संतापला पिता, चार वर्षांच्या चिमुकलीची गळा दाबून हत्या अन्...

Pune News : देशी गोवंश संवर्धन हे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT