farmer vanchit.jpg 
नाशिक

तब्बल १३४७ शेतकऱ्यांनी संपविली आपली जीवनयात्रा; उत्तर महाराष्ट्रातील धक्कादायक वास्तव समोर

प्रशांत बैरागी

नामपूर (जि.नाशिक) : शेतकरी हा जगाचा पोशिंदा असल्याने ‘अन्नदाता सुखी भव’ असे आदराने बोलले जाते. तरीही शेती व्यवसायात असणाऱ्या अस्मानी व सुलतानी संकटांच्या मालिकेमुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या हा चिंतेचा विषय बनला आहे. गेल्या पाच वर्षांत नाशिकसारख्या शेतीसधन जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात तब्बल एक हजार ३४७ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 

उत्तर महाराष्ट्रात एक हजार ३४७ शेतकऱ्यांची आत्महत्या 
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या दुःखावर मायेचा हात फिरविण्यासाठी महसूल प्रशासन सज्ज झाले असून, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी ‘उभारी’ हा कार्यक्रम उत्तर महाराष्ट्रात राबविण्याचा निर्णय विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतला आहे. त्यानुसार संबंधित कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांना आत्मसन्मानाने जीवन व्यतीत करता यावे, हा यामागचा उद्देश आहे. 
शासन नियमात बसणाऱ्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला सरकार एक लाख रुपयांची मदत करते. परंतु कुटुंबप्रमुख गेल्यानंतर अनंत अडचणींचा सामना त्यांच्या परिवाराला करावा लागतो. त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांच्या कुटुंबीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ देण्याचा निर्णय गमे यांनी घेतला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नगर, नंदुरबार अशा पाच जिल्ह्यांतील शेतकरी कुटुंबांना त्याचा लाभ होईल. 

महसूल विभागाकडून कुटुंबीयांना ‘उभारी’तून दिलासा देण्याचा प्रयत्न 
शेतकरी आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबांची काय अवस्था झाली, याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्यात आला आहे. शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्राधान्यक्रम द्यावा, अशा सूचना तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. शेतकरी कुटुंबांची शासकीय कार्यालयात अडवणूक झाल्यास तहसील कार्यालयात तक्रार करावी. -जितेंद्र इंगळे पाटील, तहसीलदार, बागलाण 

हेही वाचा - सरपंचपद भोगल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना! माजी सरपंचांवर आज मजुरीची वेळ 
अशा आहेत शेतकऱ्यांसाठी योजना 
* वैरण विकास योजना 
* राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना 
* महात्मा फुले जनआरोग्य योजना 
* समृद्धी महाराष्ट्र जनकल्याण योजना 
* बळीराजा चेतना अभियान 
* शेळी गट योजना 
* बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना 
* सामुदायिक विवाह सोहळा योजना 
* महात्मा गांधी रोजगार हमी योजना 


तालुकानिहाय आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या : 
* मालेगाव ५३ 
* बागलाण ३७ 
* निफाड ३१ 
* दिंडोरी ३१ 
* नांदगाव २७ 
* चांदवड १९ 
* सिन्नर १४ 
* येवला १२ 
* कळवण १२ 
* देवळा ७ 
* नाशिक ४ 
* त्र्यंबकेश्वर ४ 
* इगतपुरी २ 
* पेठ १ 
* सुरगाणा १  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyanka Gandhi Latest News : काँग्रेसने प्रियांका गांधींवर सोपवली महत्त्वाची जबाबदारी!, पाच राज्यांमधील 'स्क्रीनिंग कमिटी' केली स्थापन

India Vs Bangladesh cricket : भारत आता बांगलादेश सोबतही नाही खेळणार क्रिकेट?; हिंसाचाराच्या घटनांचे क्रिकेट विश्वात पडसाद!

Manoj Jarange:समाजापेक्षा कुणीच मोठे नाही: मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे; आंदोलनाची वेळ आल्यास सरकारचं अवघड होईल!

ShivrajSingh Chouhan: लाडकी बहीण योजना थांबणार नाही: केंद्रीयमंत्री शिवराजसिंह चौहान; विरोधी पक्षाकडून जाणीवपूर्वक अपप्रचार!

Solapur politics: साेलापुरात कार्यकर्त्यांचे अश्रू नजरेआड! ‘आत्यावरील अन्यायाने’ व्यथित, तीस वर्षांपासून एकनिष्ठ अर्ज माघारी अन्..

SCROLL FOR NEXT