irst cycle of Palakhed left canal 
नाशिक

पालखेडच्या आवर्तनामुळे वीस हजारांवर हेक्टर ओलिताखाली; येवल्यात ५० वर गावांना फायदा

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : यंदा सरतेशेवटी जोरदार पाऊस झाला असला तरी तालुक्यातील बहुतांश भागात विहिरींनी तळ गाठला आहे. अशातच २० फेब्रुवारीपासून सुरू झालेले पालखेड डाव्या कालव्याचे पहिले आवर्तन शेतकऱ्यांना गरजेच्या काळात उपयुक्त ठरले असून, या सिंचनाच्या आवर्तनाने लाभक्षेत्रातील सुमारे १५ ते २० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ५० वर गावांना याचा फायदा झाला असून, पुढील तीन दिवस ४६ ते ५२ वितरिकेला पाणी देण्यात येणार आहे. 

भौगोलिकदृष्ट्या तालुका तीन भागात विभागला गेला आहे. अवर्षणप्रवण ईशान्य भागाला कुठल्याही कालव्याचे पाणी मिळत नसून पूर्णतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. याउलट पश्‍चिम व पूर्व भागातील काही गावे पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात येतात. यामुळे पालखेडसह धरण समूह शंभर टक्के भरले, की रब्बीसाठी तालुक्याला दोन आवर्तने नक्कीच मिळतात. यंदाही अशीच परिस्थिती असून, पहिले आवर्तन २० फेब्रुवारीला सोडण्यात आले आहे. हे आवर्तन अद्यापही सुरू असून, याद्वारे सुमारे २० हजारांच्या आसपास हेक्‍टर क्षेत्र आतापर्यंत ओलिताखाली आलेले आहे. याशिवाय अजून तीन ते चार दिवस आवर्तन चालणार असून, अंदरसूलच्या पुढील वितरिका ४६ ते ५२ ला पाणी सोडण्यात आले आहे. वास्तविक, हा भाग नेहमीच पाण्यासाठी आसुसलेला असतो. दर वेळी जोरदार मागणी करावी लागते, तेव्हा पाणी नशिबी असते. आताही सरतेशेवटी पाणी सोडले जात आहे. तालुक्याची सध्याची परिस्थिती पाहता आवर्तनाची नितांत गरज होती. रब्बी पिके, तसेच रांगडे व उन्हाळ कांदे ऐन मोसमात असून, टंचाई जाणवू लागल्याने पालखेडच्या आवर्तनाने या पिकांना उभारी दिली आहे.

तीन आवर्तनाची अपेक्षा 

या वर्षी धरण क्षेत्रात मुसळधार नसला तरी धरणे पूर्ण क्षमतेने भरेल इतका पाऊस झालेला आहे. त्यातच डिसेंबरपर्यंत कुठेही पाण्याची मागणी नसल्याने साठा टिकून आहे. हे पाणी तालुक्यासाठी उपयोगात आणून या वर्षी तिसरे आवर्तनही मिळावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. पुढील महिन्यात दुसरे आवर्तन मिळण्याचे नियोजन आहे. मार्चनंतर तिसरे आवर्तन मिळाल्यास दुष्काळी येवल्यातील सर्वच गावांना फायदा होऊ शकेल. 

येवल्याला तीन दिवसांआड पाणीपुरवठा 

पालखेडच्या आवर्तनाने मनमाड शहर, मनमाड रेल्वे, तसेच येवला शहर व ३८ गाव पाणीपुरवठा योजनेच्या तलावात पाणी देण्यात आले आहे. यामुळे या गावातील पुढील दोन महिन्यांची पाणीटंचाईही मिटली आहे. शहराचा पाणीपुरवठा चार दिवसांआड होता. तो तलाव भरल्याने तीन दिवसांत करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT