Gharkul Scheme
Gharkul Scheme esakal
नाशिक

Gharkul Scheme : शिवाजीवाडीमधील 13 लाभार्थ्यांचे घरकुल रद्द!

विक्रांत मते

नाशिक : पूर्व विभागातील शिवाजीवाडीमध्ये महापालिकेने बांधलेल्या घरकुल योजनेतील १३ लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा न भरल्याने त्यांची घरकुले रद्द करण्याचा निर्णय घेतला असून, त्या अनुषंगाने महापालिकेने जाहीर नोटीस काढली आहे. (Gharkul scheme of 13 beneficiaries in Shivajiwadi cancelled Nashik News)

केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत महापालिकेने घरकुल योजना राबवली. या योजनेच्या माध्यमातून १६००० घरकुल उभारण्याचे उद्दिष्ट होते. परंतु, घरकुलासाठी जमीन मिळण्यापासून ते लाभार्थी मिळण्यापर्यंत अनेक अडचणी निर्माण झाल्याने टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांची संख्या कमी होत गेली. निलगिरी बाग येथे ११२०, सिडकोतील चुंचाळे येथे २८०० व ९६० असे दोन विभाग, पूर्व विभागातील वडाळा गाव येथे ७२०, भारतनगर येथे १४६०, तर सातपूर विभागात ४०० असे एकूण ७४६० घरकुले उभारण्यात आली.

लाभार्थ्यांना घरकुलाचे वाटप करताना शासनाकडून अटी टाकण्यात आल्या होत्या. घरकुलाच्या एकूण रकमेपैकी काही प्रमाणात हिस्सा देणे बंधनकारक होते. एकूण लाभार्थ्यांपैकी शिवाजीवाडीतील १३ लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा अदा न केल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मुदतीमध्ये आर्थिक हिस्सा अदा न केल्यास घरकुले रद्द करून त्याचा लाभ इतर पात्र तेरा लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pankaja Munde: पंकजा मुंडेंना खासदार करा, अन्यथा मी... उदयनराजे बीडकरांना टोकाचं बोलले; दोन्ही नेत्यांच्या डोळ्यात अश्रू

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांनी घेतलं हनुमानाचं दर्शन

Viral Video: OYO हॉटेल्स बंद पाडणाऱ्या भाजप आमदाराच्या ऑफिसबाहेरच कपल्सचा रोमान्स? व्हिडिओ होतोय व्हायरल

Cryptocurrency: जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी भारतात येण्याच्या तयारीत; रिझर्व्ह बँक काय निर्णय घेणार?

25 years of Sarfarosh : आमिर खानला 25 वर्षानंतरही होतोय 'या' गोष्टीचा पश्चाताप; दिग्दर्शकाने केली पोलखोल

SCROLL FOR NEXT