Manmad-Mumbai Godavari Express) sakal
नाशिक

गोदावरी एक्स्प्रेस हिंगोलीपर्यंत नेण्यास नाशिककरांचा विरोध

गोदावरी एक्स्प्रेस ही पंचवटीप्रमाणेच नाशिककरांची सोयीची व आवडीची गाडी

सकाळ वृत्तसेवा

नाशिक रोड : हिंगोलीच्या नागरिकांना मुंबईला जाण्यासाठी सोयीचे व्हावे, यासाठी मनमाड- मुंबई गोदावरी एक्स्प्रेस (Manmad-Mumbai Godavari Express) हिंगोलीपर्यंत नेण्याची मागणी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना तसे पत्र लिहिले आहे. नाशिककरांनी मात्र या मागणीला विरोध केला आहे. सध्या गोदावरी एक्स्प्रेस (गाडी नं. १२११७ आणि १२११८) कोरोना संकटामुळे दोन वर्षापासून बंद आहे. ती सुरू करण्याची जोरदार मागणी असूनही रेल्वे दुर्लक्ष करत आहेत.

मनमाडहून सुटणारी गोदावरी एक्स्प्रेस मुंबईला जाण्यासाठी नाशिक जिल्हा व शहरातील नागरिकांसाठी अत्यंत सोयीची आहे. या गाडीची वेळ तीच ठेऊन ती हिंगोलीपर्यंत न्यावी, अशी त्या जिल्ह्यातील नागरिकांची मागणी आहे. गाडीच्या मार्गात हिंगोली, पूर्णा, परभणी, जालना, मुकुंदवाडी, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक, देवळाली, इगतपुरी, कल्याण, ठाणे, दादर, मुंबई ही प्रमुख स्थानके घ्यावीत, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे. ही गाडी हिंगोलीपर्यंत नेण्यास नाशिककरांनी विरोध केला आहे.

गाडी जिल्ह्याबाहेर नेऊ नये, अशी मागणी मासिक पासधारक व प्रवासी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेश फोकणे, माजी आमदार योगेश घोलप, किरण बोरसे, संजय शिंदे, कैलास बर्वे, उज्ज्वला कोल्हे, दत्ताराम गोसावी, नितीन जगताप, रेल परिषदेचे गुरुमितसिंग रावल, रेल्वे प्रवासी संघटनेचे बाळासाहेब केदारे आदींनी केली आहे. गोदावरी एक्स्प्रेस ही पंचवटीप्रमाणेच नाशिककरांची सोयीची व आवडीची गाडी आहे.

मुंबईला जाताना सकाळी साडेनऊला तीन नाशिक रोडला येते. ती हिंगोलीपर्यंत नेल्यास मराठवाड्याच्या नागरिकांची सोय होणार असली तरी नाशिककरांची गैरसोय होणार आहे. हिंगोलीपर्यंत गाडी नेल्यास ती तिकडूनच पूर्ण भरून येईल. मनमाड, निफाड, नाशिक रोड, देवळाली, इगतपुरी या स्थानकातील नाशिककरांना जागा मिळणार नाही, असा आक्षेप आहे. नाशिक- पुणे एक्स्प्रेस नाशिकपर्यंत होती, ती भुसावळपर्यंत नेण्यात आल्याने नाशिककरांना जागा मिळत नाही. तपोवन एक्स्प्रेस मनमाडपर्यंत होती, ती पळवून नांदेडपर्यंत नेण्यात आली. राज्यराणी एक्स्प्रेसही मनमाड- मुंबई अशी होती, ती जालन्यापर्यंत नेण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

बाबो! सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं? सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट चर्चेत, चाहत्यांचा म्हणाले..."हीच का आपली वहिनी?"

SCROLL FOR NEXT