yeola rain Sakal
नाशिक

येवला तालुक्यातही पावसाचा कहर; सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान

संतोष विंचू

येवला (जि नाशिक) : शहर व तालुक्यात मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने आजही सर्वत्र जोरदार हजेरी लावली. यामुळे तालुक्यातील बंधारे, नदी, नाले भरून वाहत आहेत. येवला- भारम रस्त्यावरील नागडे गावाजवळील पूल देखील पाण्याखाली गेला आहे. आज सकाळी संपलेल्या २४ तासांत ५१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.


तालुक्याच्या पूर्व भागात सुरुवातीपासूनच पावसाचा जोर असल्याने अनेक ठिकाणी जमिनी उपळल्या असून पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यातच मंगळवार व बुधवारच्या पावसाने अजून भर पडल्याने मोठे क्षेत्र पाण्याखाली गेल्याची स्थिती आहे. पश्चिम पट्ट्यातही अगोदर अल्प पाऊस होता,मात्र आता पावसाने सर्वत्र हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी झाले आहेत किंबहुना अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे सततच्या पावसामुळे नुकसान होऊ लागले आहे.

जळगाव नेऊर, देशमाने येथील गाय व गोई नदीला तुडुंब पाणी वाहत आहे. याशिवाय डोंगरगाव, सावरगाव, खिर्डीसाठे येथील लघुपाटबंधारे पाझर तलाव देखील अर्ध्याहून अधिक भरल्याचे चित्र आहे. बुधवारी सकाळी आठला संपलेल्या २४ तासांत येवला मंडळात ५१,अंदरसूलला ४२, नगरसूलला ४८, पाटोदा येथे ५१, सावरगावला ४७, जळगाव नेऊरला ४४ असा एकूण २८३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. याशिवाय आज सकाळपासूनच पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात दुपारपर्यंत सुरू होता. दुपारनंतर काहीशी उघडीप मिळाली. पावसाने खरिपासह रब्बीचाही प्रश्न सोडवला असला तरी अद्याप काही भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा असून काही भागातील शेतकरी मात्र आता पावसाने उघडीप द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.


नारंदी नदीवरील पुलावरून पाणी

येवला - भारम रस्त्यावरील नागडे गावाजवळील नारंदी नदीला पूर आल्याने पुलावर पावसाचे पाणी वाहत असल्याने काही काळ अनेक गावांचा संपर्क तुटला होता. वाहनचालक पुलावरील वाहत्या पाण्यातून जीवघेणी कसरत करत असल्याचे चित्र दिसत होते. तालुक्‍यात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे बंधारे भरल्याने नागडे गावातील नारंदी नदीच्या पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पुलावरील पाणी ओसरत गेल्याने वाहतूक हळूहळू सुरू झाली असली तरीदेखील या पुलावरून तीन ते चार फूट पाणी अजूनही वाहत होते. नागडे गावाजवळील नारंदी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने येणारे जाणारे वाहन चालक तसेच दुचाकीस्वार जीवघेणी कसरत करत वाहत्या पाण्यातून आपली वाहने काढत असल्याचे दिसले.

बसस्थानक रस्ता पाण्याखाली

शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. शहरातील मुख्य मार्गावरून पाऊस येताच नदी सारखे पाणी वाहताना दिसत होते.शहरातील बस स्टँड परिसरात देखील पाणी आल्याने बसस्थानक व अमरधाम कडे जाणारा रोड देखील पाण्याखाली गेला आहे.रस्त्यावर पाणी आल्याने बसस्थानकावर जाणाऱ्या प्रवाशांचे देखील हाल झाली.एकूणच आलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असला तरीदेखील रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र तालुक्यात दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT