ghoti accident.jpg 
नाशिक

कसारा घाटात कंटेनरच्या धडकेत महामार्ग कर्मचारी ठार; दोन जखमी

पोपट गंवादे

इगतपुरी (नाशिक) : नाशिकहून मुंबईकडे जात असताना नवीन कसारा घाटात महामार्गावर कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने महामार्गाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यापैकी एक ठार, तर दोन जखमी झाले. या घटनेमुळे महामार्ग कर्मचाऱ्यांमध्ये शोकाचे वातावरण आहे.

अशी आहे घटना
 
शनिवारी (ता.९ ) दुपारी बाराच्या दरम्यान नाशिकहून मुंबईकडे जाणारा कंटेनर (एमएच १२- एफसी ८५१०) चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. चालकाने चालत्या गाडीतून उडी मारली. या कंटेनरने कसारा घाटात दुरुस्तीचे काम करत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांना उडवले. यात एक कर्मचारी जागीच मृत पावला, तर दोन कर्मचाऱ्यांना जबर मार लागला. काही कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत बाजूला उड्या मारल्या. सुनील भगत (२५, रा. पेठेचा पाडा, ता. शहापूर) असे मृत कर्मचाऱ्याचे नाव आहे. संतोष कालचिडे, बाळू कामडी (२६, दोघे रा. पेठेचा पाडा, ता. शहापूर) जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी इगतपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार सुरू आहेत. पुढील तपास महामार्ग पोलिस सहाय्यक निरीक्षक अमोल वालझाडे करीत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोरून अपहरण, २ हजार मृत्यूंचं गूढ अन्...; कोण होते 'सतलुज'चे खरे नायक जसवंत सिंह खालरा?

"We Want Sanju!"; चाहत्यांची नारेबाजी... गौतम गंभीरचा चेहरा पाहण्यासारखा झाला, तिलक वर्माही सोबत होता; Viral Video

'मलाही माहितेय की तो कसा आहे?' अंकुश चौधरीबद्दल दीपा परब म्हणाली, 'आम्ही नवरा बायको होण्याअगोदर...'

Wari Prasthan 2026:आषाढी वारीसाठी पालखीचं प्रस्थान होतं म्हणजे नेमकं काय ? प्रस्थानत्रयी म्हणजे काय ?

Ulhas River: धोक्याची घंटा! उल्हास नदीने गाठली इशारा पातळी; कल्याण-डोंबिवलीकरांवर पुराचे संकट, प्रशासनचा हाय अलर्ट

SCROLL FOR NEXT