nashik mumbai highway.jpg 
नाशिक

आता नाशिक-मुंबई प्रवास केवळ अडीच तासांवर! उद्योग व्यवसायाला मिळणार मोठी चालना 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आता नाशिक-मुंबई प्रवासाचे अंतर कमी होणार असून, अवघ्या अडीच तासाच नाशिककरांना मुंबईत पोहचणे शक्य होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे. यामुळे उद्योग व्यवसायाला देखील मोठी चालना मिळणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली आहे.

दोन्ही महामार्गाच्या जोडणीमुळे नाशिक-मुंबई प्रवासाचे अंतर कमी

समृद्धी महामार्ग व मुंबई महामार्ग या दोन्ही महामार्गांना हा पूल जोडला जाणार आहे. दोन्ही महामार्गाच्या जोडणीमुळे नाशिक-मुंबई प्रवासाचे अंतर कमी होणार असून, अवघ्या अडीच तासाच नाशिककरांना मुंबईत पोहचणे शक्य होणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली आहे. तसेच वडपे ते गोंदे या दरम्यानच्या महामार्ग देखील सहा पदरी करणाचा प्रस्तावही लवकरच मंजूर होणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले.

खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांना यश

वाढत्या अपघातांना आळा बसावा, नाशिक-मुंबई प्रवासाचा कालावधी कमी व्हावा, वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी समृद्धी महामार्ग आणि नाशिक-मुंबई महामार्ग क्र. ३ यांच्यात उड्डाणपुलाद्वारे जोडणी व्हावी यासाठी खासदार गोडसे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या उभारणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ४८ कोटी रुपयांच्या खर्चाला तत्त्वत: मान्यता दिली आहे. इगतपुरी तालुक्यातील मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंप्री फाटा येथे उड्डाणपूल उभारण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

उद्योग व्यवसायाला मिळणार मोठी चालना

या उड्डाण पुलाची लांबी सुमारे ७८ मीटर असून हा उड्डाणपूल सहा पदरी आहे. गोंदेपर्यंत महामार्गाच्या सहा पदरीकरणाच्या प्रस्ताव ही आता लवकरच मार्गी लागणार आहे. यामुळे नाशिक-मुंबई हा प्रवास आता अडीच तासांवर येणार असून, उद्योग व्यवसायाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती गोडसे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK : शफाली वर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! पाकिस्तानला पहिल्याच चेंडूवर जागा दाखवली; जगात भारी कामगिरी केली Video Viral

DCM Sunetra Pawar : हजार शाळा ‘मॉडेल स्कूल’बनविणार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

India China Strategy: चीनच्या तुलनेत भारताची तंत्रज्ञान क्षमता वाढविण्याची गरज; ‘चायना कॉन्फरन्स २०२६’मध्ये तज्ज्ञांचा सूर

Sangramdurg Ground Fort : ‘संग्रामदुर्ग’चा दोनशे वर्षांपूर्वीचा नकाशा पुरातत्त्व विभागाकडे मिळाला

Narendra Modi: मोदींचा राहुल गांधींवर हल्ला! म्हणाले, त्यांचा एकच पेटंट डायलॉग असतो.. 'याची काय गरज होती?'

SCROLL FOR NEXT