lockdown labour 2.jpg 
नाशिक

परप्रांतीयांना यायचयं महाराष्ट्रात? जथा लवकरच पोहचतोय...कमबॅकची तयारी सुरू..

गोकुळ खैरनार : सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : कोरोनामुळे गावी गेलेल्या परप्रांतीय मजुरांना महाराष्ट्रात परतण्याचे वेध लागले आहेत. अनेक जण जनरल बोगी सुरू होण्याची वाट पाहत आहेत. सुरवातीला बहुसंख्य कामगार एकटेच येणार आहेत.

हजारो कामगारांची धडपड सुरू

पवन एक्‍स्प्रेसने शुक्रवारी (ता. 12) 20 परप्रांतीयांचा जथा "कसमादे'त पोचणार आहे. बिहार व उत्तर प्रदेशमध्ये पुरेसे काम नसल्याने मजुरांचे "कमबॅक' सुरू झाले आहे. रेल्वेची जनरल बोगी बंद असल्याने रिझर्व्हेशनसाठी हजारो कामगारांची धडपड सुरू आहे. अवजड कामांसाठी हे कामगार माहीर आहेत. 

मालक-कामगार दोघांनाही गरज 
लॉकडाउननंतर कसमादे पट्ट्यातील परप्रांतीय हजार-बाराशे कामगार गावी गेले. 1 जूनपासून उद्योग-व्यवसाय सुरू झाल्याने अवजड कामांसाठी या मजुरांची उणीव भासू लागली आहे. मजूर गावी गेले, तरी ते जेथे कामाला होते त्या मालक व व्यवस्थापनाशी संपर्क ठेवून होते. आर्थिक परिस्थितीने संकटात असलेला मजूर पुन्हा महाराष्ट्रात येण्यास उत्सुक आहे. मालक आणि मजूर दोघांची गरज पाहता आगामी काळात उत्तर भारतीयांचे लोंढे पुन्हा महाराष्ट्रात परतल्यास नवल वाटू नये. 

हेही वाचा > "चमत्कार झाला..! मालेगावात नेमके काय घडले?" सर्वत्र आश्चर्य..!

कामगार रिझर्व्हेशनच्या रांगेत 
सध्या देशात 200 ट्रेन धावत आहेत. यात पाटण्याहून मनमाडमार्गे मुंबईला जाणाऱ्या तीन गाड्यांचा समावेश आहे. ऑनलाइन रिझर्व्हेशन व प्रकृती चांगली असलेल्यांनाच प्रवास करता येत आहे. त्यामुळे हजारो कामगार रिझर्व्हेशनच्या वेटिंग लिस्टवर आहेत. अनेक जण जनरल बोगी सुरू होण्याची वाट पाहत आहेत. सुरवातीला बहुसंख्य कामगार एकटेच येणार आहेत. रोजगार व परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर चार-सहा महिन्यांत कुटुंब आणण्याचे नियोजन आहे. 

20 कामगारांचे तिकीट पक्के 
"कसमादे'त पोल्ट्री कामासाठी येणाऱ्या मोतिहारी (जि. सलही, बिहार) येथील 20 कामगारांचे तिकीट पक्के झाले आहे. पवन एक्‍स्प्रेसने शुक्रवारपर्यंत ते या भागात पोचतील. परप्रांतीय मजूर "कसमादे'त पोल्ट्री उद्योग, कांदा व मका व्यापाऱ्यांकडे पोती भरणे, मोठ्या गोठ्यांमध्ये दूध काढणे, रस्त्यांची कामे, बाजार समित्यांमधील मोठ्या व्यावसायिकांकडे काम करतात. यातील अनेकांची राहण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणाजवळच असते. 100 किलोंचे पोते कामगार लीलया उचलून पाठीवरून वाहून नेतात. 

पुन्हा मूळ कामावर येत असल्याचा आनंद

महाराष्ट्राने वर्षानुवर्षे आम्हाला रोजीरोटी दिली. गावी दिवसाला 200 ते 250 रोज मिळतो. काहींना तर तोही मिळत नाही. महाराष्ट्रात पुरेसा रोजगार व दिवसाला पाचशे रुपयांपेक्षा अधिक पैसे मिळतात. पुन्हा मूळ कामावर येत असल्याचा आनंद आहे. -धुरूप सहानी, कामगार, मोतिहारी (बिहार) 
 

बिहारी मजूर कोणतेही काम करण्यास तयार असतात. वर्षानुवर्षे ते या भागात काम करीत आहेत. गावी गेल्यापासून ते संपर्कात आहेत. तेथे रोजगार नसल्याने बहुसंख्य मजूर पुन्हा या भागात कामासाठी येण्यास इच्छुक आहेत. -संजय हिरे, संचालक, सुमंगल ग्रुप इंडस्ट्रीज 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 Asia Cup: भारताचा सलग तिसरा विजय! आधी अभिज्ञान कुंडूने द्विशतक करत चोपलं अन् मग दीपेशने ५ विकेट्स घेत मलेशियाचा उडवला धुव्वा

SSC And HSC Board Exam: महत्त्वाची बातमी! डिजिटल मार्कशीटसाठी दहावी-बारावी विद्यार्थ्यांना 'APAAR ID' नोंदणी करणं बंधनकारक

Palghar Bribery Case : नवापूरचा ग्रामसेवक लाच घेताना अटकेत; कृषी पर्यटन परवान्यासाठी २० हजारांची मागणी!

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत शेतकऱ्यांनी कापणी केलेले धान पंचवीस दिवसांपासून रस्त्यावरच

Buldhana Accident : लेकीनं डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं, पण अपघाताने होत्याचं नव्हतं केलं; आई-बाबांना करावे लागले अंत्यसंस्कार...

SCROLL FOR NEXT