manikpunj dam.jpg Sakal
नाशिक

वरुणराजाची निम्म्या जिल्ह्यात हजेरी; धरणांत ६५ टक्के जलसाठा

महेंद्र महाजन

नाशिक : जिल्ह्यावर रुसलेल्या वरुणराजाने मागील २४ तासांत निम्म्या जिल्ह्यात हजेरी लावली. मात्र, जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने मोठ्या सात आणि मध्यम १७, अशा २४ प्रकल्पांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १३ टक्के कमी म्हणजेच आतापर्यंत ६५ टक्के जलसाठा झाला आहे.

गेल्यावर्षी ऑगस्टअखेर भावली, वालदेवी, कडवा, भोजापूर, हरणबारी, केळकर, नाग्यासाक्या, माणिकपुंज अशी आठ धरणे फुल झाली होती. त्या वेळी २४ प्रकल्पांमध्ये ७८ टक्के जलसाठा झाला होता. आता आळंदी, भावली, कडवा, हरणबारी, माणिकपुंज ही पाच धरणे फुल झाली आहेत. सद्यःस्थितीत आळंदीमधून ३०, भावलीतून १३५, वालदेवीमधून ६५, हरणबारीमधून ५६ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण गेल्यावर्षी ऑगस्टअखेर ९४ टक्के भरले होते. आता त्यात ९१ टक्के साठा झाला आहे. कश्‍यपीमध्ये मात्र गेल्यावर्षीपेक्षा दोन टक्के अधिक म्हणजेच ६६ टक्के साठा झाला आहे. गौतमी गोदावरीमध्ये तीन टक्के कमी म्हणजेच ७३ टक्के साठा झाला आहे.

दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी (ता. ३१) सकाळी आठला संपलेल्या २४ तासांत तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा ः नाशिक- ९, इगतपुरी- ३३, दिंडोरी- ७, पेठ- २१.१, त्र्यंबकेश्‍वर- १८, मालेगाव- ४४, नांदगाव- ३७, चांदवड- ९, कळवण- ११, बागलाण- १८.४, सुरगाणा- ३५.१, देवळा- ०.३, निफाड- ४, सिन्नर- ०, येवला- २६. तालुकानिहाय झालेल्या पावसाची टक्केवारी याप्रमाणे ः नाशिक- ४१.१३, इगतपुरी- ७७.३४, दिंडोरी- ५२.८६, पेठ- ७४.७९, त्र्यंबकेश्‍वर- ६०.०८, मालेगाव- ८२.८२, नांदगाव- ८३.४५, चांदवड- ३४.७५, कळवण- ५६.४४, बागलाण- ६८.५०, सुरगाणा- ७७.६५, देवळा- ७५.११, निफाड- ७८.४३, सिन्नर- ४६.५२, येवला- ७१.८७. जिल्ह्यात आतापर्यंत ६८.१७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी ऑगस्टअखेर जिल्ह्यात ८६.९७ टक्के पाऊस झाला होता. पावसाची ही आकडेवारी पाहता नाशिक, चांदवड, सिन्नर तालुक्यांला आणखी पावसाची आवश्‍यकता असल्याचे स्पष्ट होते.

जोरदार पावसाची शक्यता

कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हवामान विभागाने जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे. मंगळवारी (ता. ३१) पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती जिल्ह्यांचा समावेश आहे. तसेच राज्यात तुरळक सरींचा अंदाज वर्तवितला आहे. बुधवारी (ता. १) नाशिक, नंदुरबारसह पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड, अकोला जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील राजुरामध्ये ६ हजार ८५० मते वाढली- राहुल गांधी

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT