rajasthani lockdown.jpg
rajasthani lockdown.jpg 
नाशिक

#Lockdown : ...अन् निफाडहून "ते" पायीच चालत निघाले राजस्थानला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक :  पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थानहून जिल्ह्यातील निफाड येथे गारेगार विकणाऱ्या राजस्थानी युवकांवर चांगलेच संकट कोसळले आहे. देशभरात पसरलेल्या भीतीदायक वातावरणात हे चार युवक निफाडवरून राजस्थानच्या दिशेने पायी निघाले आहेत. खिशात पैशाचा तुटवडा खायला-प्यायला अन्नही नाही अशा अवस्थेत हे युवक राजस्थानच्या दिशेने पायी निघाले आहे. सुमारे पाचशे ते सहाशे किलोमीटरचे अंतर या युवकांकडून कसे गाठले जाणार? याबाबत निफाडकरांनी हळहळ व्यक्त केली आहे.

निफाडकरांची हळहळ व्यक्त

निफाड येथे गारेगार विकणाऱ्या एका राजस्थानच्या कारागिराने आपल्याच राज्यातील चार युवकांना गारेगार आईस्क्रीम विकण्यासाठी निफाड येथे बोलावून त्यांना रोजगार दिला आहे. गेल्या महिन्यात संबंधित मालक लग्नकार्यासाठी राजस्थानात गेला आणि देशभरात करोनाचे वातावरण तयार झाले. त्यामुळे तो नाशिक, निफाडला येण्यास उशिर झाला. त्यातच २५ मार्चपासून संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यामुळे तो मालक आता राजस्थानमध्येच अडकला आहे. मालक येत नसल्याने या युवकांपुढे मोठा पेच उभा राहिला. आता या अनोळखी शहरात जगायचं कसं आणि कोणाचा भरवशावर, या विचाराने ते हादरले.

खिशात पैसे नाही आणि बँकेत पैसे टाकायला मालकाला राजस्थामध्ये घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे या चार राजस्थानी युवकांनी पायीचे राजस्थान गाठण्याचा निर्णय घेतला आहे. खिशात दमडी नसताना बरोबर अन्नसाठा नसताना हे युवक रस्त्याने जे मिळेल ते घेत आपल्या घराच्या दिशेने पायी निघाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Traffic Noise: गाड्यांच्या आवाजामुळे वाढू शकतो हृदयविकार, डायबेटिस आणि स्ट्रोकचा धोका; धक्कादायक संशोधन समोर

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

SCROLL FOR NEXT