onion export 1.jpg 
नाशिक

"शिपिंग इफिशिअन्सी'' घटल्याने 'कांदा' निर्यातदारांना भरली धडकी!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोना विषाणूच्या प्रसारास प्रतिबंधासाठी बंदरातील मनुष्यबळाची कपात वाढविल्याने "शिपिंग इफिशिअन्सी' घटली आहे. त्यामुळे कांदा निर्यातदार धास्तावले आहेत. एवढेच नव्हे, तर मलेशियाकडे जाणारे जहाज तीन दिवसांपासून निघालेले नाही, अशी माहिती निर्यातदारांपर्यंत पोचली आहे. श्रीलंकेत संचारबंदीची चर्चा सुरू झाल्यावर निर्यातदारांनी माहिती घेतली असता, ती अफवा असल्याचे स्पष्ट झाल्याने सुटकेचा निःश्‍वास सोडण्यात आला. 

भारतात "लॉक डाउन' होईल अशी भीती

कांदा निर्यातीचा 15 मार्चचा मुहूर्त जाहीर झाल्यावर पुरेसा वेळ तयारीसाठी निर्यातदारांना मिळाला. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत कांदा मोठ्या प्रमाणात विकला जाईल, असा विश्‍वास निर्यातदारांमध्ये निर्माण झाला होता. मात्र, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी जगभरात उपाययोजना सुरू आहेत. त्याच वेळी जहाजाने कांदा पाठविल्यावर बंदर बंद केले गेल्यास काय करायचे, असा प्रश्‍न निर्यातदारांपुढे उभा ठाकला आहे. शिवाय देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचे भाव घसरल्याने जहाजासाठी पाठविण्यात आलेल्या कांद्याचे भाव कमी करण्याची मागणी आयातदारांनी केल्यावर काय करायचे, असा प्रश्‍न निर्यातदारांना भेडसावू लागला आहे. एवढेच नव्हे, तर भारतात "लॉक डाउन' होईल काय, अशी विचारणा आयातदार करत असल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर हातात असलेली मागणी पूर्ण झाल्यावर पुन्हा कांदा खरेदी न करण्याची भूमिका निर्यातदारांनी स्वीकारली आहे. या साऱ्या वातावरणाचा परिपाक म्हणजे, कांद्याच्या ढासळणाऱ्या भावाची समस्या थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. 

भाव घसरला 900 रुपयांपर्यंत

कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील कांद्याचा भाव क्विंटलला 900 रुपयांपर्यंत घसरला आहे. गुरुवारी (ता. 19) चांदवडमध्ये 900 रुपये क्विंटल या भावाने कांदा विकला गेला. कळवण, लासलगाव, पिंपळगावमध्ये अकराशे रुपये भाव मिळाला. मनमाडमध्ये 913, नामपूरमध्ये एक हजार 250, उमराणेमध्ये बाराशे रुपये क्विंटल असा भाव शेतकऱ्यांना मिळाला. 

राज्यातील क्विंटलचा सरासरी भाव (रुपयांमध्ये) 

औरंगाबाद- एक हजार, धुळे- एक हजार, जळगाव- 900, 
कोल्हापूर- तेराशे, मुंबई- सोळाशे, नागपूर- एक हजार 610, 
पुणे- एक हजार 50, सोलापूर- 900 

देशांतर्गतचे भाव याप्रमाणे  

अहमदाबाद- चौदाशे, अल्वर- दोन हजार, भुवनेश्‍वर- दोन हजार 350, 
चेन्नई- एक हजार 900, दिल्ली- एक हजार 750, 
कोलकता- एक हजार 813, महुआ- 850, पाटणा- एक हजार 650. 

बाजार समित्या बंद ठेवू नका 

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतमालाचे व्यवहार सुरू ठेवण्याच्या सूचना पणन संचालक सुनील पवार यांनी दिल्या आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समित्यांनी दक्षता घ्यावी. त्याच वेळी अन्नधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाल्या चा पुरवठा सुरळीत होणे आवश्‍यक असल्याने शेतमाल विक्रीमध्ये अडचण येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. बाजार समित्यांचे मुख्य बाजार, उपबाजार नियमितपणे सुरू ठेवावेत. त्याच वेळी बाजार समित्यांनी बाजार आवार स्वच्छ ठेवावेत. बाजार आवाराची स्वच्छता रात्री अथवा बाजाराची वेळ संपल्यानंतर करण्यात यावीत, असेही श्री. पवार यांनी आदेशात म्हटले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: श्रेयस अय्यरचे शतक, जिंकूनही पंजाब किंग्सची प्ले ऑफमधील जागा पक्की नाहीच... जाणून घ्या समीकरण

IPL 2026 KKR Playoff Scenario : कोलकाता नाइट रायडर्ससमोर अवघड गणित! पंजाबला नेट रन रेटमध्ये मागे टाकायचे असेल तर...

थायलंडला जाणं महागणार! भारतीयांसाठी Visa Free Entry रद्द; नवीन नियम लागू, आता प्रवेश कसा मिळणार?

Arjun Tendulkar: अर्जुनसोबत चुकीची वागणुक, त्यात रिषभ पंतने 'पारा' चढवला... सचिनचा मुलगा संतापला; नेमकं काय घडलं?

Monsoon Progress Update : मॉन्सूनची प्रगती हवामान विभागाचा दुजोरा, काही तासात केरळात दाखल; अरबी समुद्राचा भाग व्यापला

SCROLL FOR NEXT