passenger railway
passenger railway esakal
नाशिक

कोरोनाची लाट अन्‌ रेल्वे यार्डात अडकली पॅसेंजर

संजीव निकम

नांदगाव (जि.नाशिक) : कोरोनाची दुसरी लाट आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आदी कारणांमुळे रेल्वेच्या नियमित वेळापत्रकाचा मुहूर्त लागला नसल्याने सामान्यांना रेल्वेच्या प्रवासासाठी अजून किती काळ प्रतीक्षा करावी लागेल, हे येणार काळच सांगू शकणार आहे. त्यामुळे सामान्य जनतेला परवडणारी पॅसेंजर मात्र यार्डातच पडून आहे. तसेच विलगीकरणासाठी देशात अधिग्रहित केलेले चार हजार रेक आजही ‘जैसे थे’ आहेत. (Passenger-railway-stopped-in-railway-yard-in-Corona-wave-jpd93)

देशभरातले चार हजार रेक वापराविना

गेल्या वर्षी कोरोनाचा उद्रेक झाल्याच्या काळात देशभरातील रेल्वेरुळावरील खडखडाट थांबला व राष्ट्रीय पातळीवर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रेल्वेच्या देशभरातील मध्य व पश्चिम विभागासह १६ विभागांत जवळपास पाच हजारांहून अधिक डबे विलगीकरणासाठी ताब्यात घेऊन साठ हजारांहून अधिक बेडची सुविधा त्या-त्या राज्यांत उपलब्ध करून देण्यासाठी रेल्वेने अग्रक्रम दिला. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात नंदुरबार व पनवेल आदी ठिकाणी त्याची चांगल्या प्रकारे मदत झाली. सध्या कोरोनाची दुसरी लाट पूर्णतः ओसरली नसली तरी बऱ्यापैकी नियंत्रणात आहे. या पार्श्वभूमीवर मागणीप्रमाणे देशभरात रेल्वेगाड्या धावू लागल्या आहेत. मागणी व आवश्यकतेनुसार रेल्वेमार्गाद्वारे देशात नियमितपणे तीस हजारांहून अधिक विशेष मेल/एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत. त्यातील बहुतांश मार्गावर पॅसेंजर गाड्या अजूनही बंदच आहेत. जोपर्यंत आणि कोरोनाची परिस्थिती सुधारत नाही, तोपर्यंत नवीन वेळापत्रक आणले जाणार नाही.

घोषणांचा पाऊस

रेल्वेने दोनशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर धावणाऱ्या पॅसेंजरला एक्स्प्रेसचा दर्जा देत वेग वाढून वेळ वाचणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी पॅसेंजरच्या प्रवाशांना साधारण तिप्पट जादा भाडे मोजावे लागणार, असेही सूचित करण्यात आले होते. लॉकडाउनमुळे रेल्वेचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले, असे सांगणाऱ्या रेल्वेने पुढे काहीच केले नाही यासाठी एकूण १६ विभागांतील पाचशे पॅसेंजर गाड्यांची यादीच जाहीर केली. रेल्वेसेवा सुरू होताच त्याची अंमलबजावणी करणार म्हणून सांगण्यात आले होते. त्यासाठी पॅसेंजरचे एक्स्प्रेसमध्ये रूपांतर केल्यानंतर या गाडीचे थांबे, वेग, वेळ यांचे गणित काय असेल, याची माहिती रेल्वे मंत्रालयाने मागविली होती.

पॅसेंजर नसल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान

भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण या ठिकाणी रोज पॅसेंजरने भाजीपाला, फळे व अन्य शेतमालाच्या विक्रीसाठी जाणारे शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार आदी शेकडो प्रवाशांचा मार्ग बंद झाल्याने बेरोजगारीसह अन्य प्रकारचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. शिवाय रेल्वेला मिळणारा महसूलही ठप्प झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT