gangapur dam
gangapur dam esakal
नाशिक

नाशिक शहरावर पाणीकपातीचे ढग; पावसाळा लांबल्याने पाणीसाठा कमी

विक्रांत मते

नाशिक : गंगापूर व मुकणे धरणांमध्ये शिल्लक असेलला अल्प पाणीसाठा व लांबलेल्या पावसाच्या पार्श्‍वभूमीवर शहरावर पाणीकपातीचे ढग जमा होत असून, येत्या चार-पाच दिवसांत धरण परिसरात पाऊस न झाल्यास एकवेळ पाणीकपात होण्याची शक्यता तयार झाली आहे. गंगापूर धरण समूहात अवघे २७ टक्के, तर मुकणे धरणात अवघा २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.(Possibility-of-water-shortage-in-Nashik-city-marathi-news)

गंगापूर धरण समूहात २७, तर मुकणे धरणात २४ टक्के पाणीसाठा

नाशिक शहराला गंगापूर, दारणा व मुकणे धरणांतून पाणीपुरवठा होतो. पंचवटी, पश्‍चिम, सातपूर, सिडको विभागात गंगापूर, तर सिडको, मध्य नाशिकचा काही भाग इंदिरानगर व पाथर्डी भागात मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. दारणा धरणातून मुख्यत्वे नाशिक रोड विभागासाठी पाणी उचलले जाते. १५ ऑक्टोबर २०२० ते ३१ जुलै २०२१ या २९० दिवसांसाठी साडेपाच हजार दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित करण्यात आले होते. यात गंगापूर धरण समूहातून तीन हजार ८००, दारणा धरणातून ४००, तर मुकणे धरणातून एक हजार ३०० दशलक्ष घनफूट पाणी याप्रमाणे आरक्षण होते.

पाणीकपात अटळ?

गंगापूर धरणातून १ जुलैपर्यंत तीन हजार ६१७, तर मुकणे धरणातून एक हजार १३८ दशलक्ष घनफूट पाणी वापरण्यात आले आहे. दारणा धरणात आरक्षित असलेल्या एकूण पाण्यापैकी आतापर्यंत अवघे १६.७१ दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर झाला आहे. वालदेवी धरणात सांडपाणी सोडले जात असल्याने चेहेडी पंपिंग येथून पाणी उचलताना अळीयुक्त पाणी येत असल्याने दारणातून पाणी उचलणे बंद करण्यात आले आहे. त्याऐवजी गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून नाशिक रोडसाठी पाणीपुरवठा केला जातो. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रात मुकणे व गंगापूर धरणांतून पाणी येते. साधारण १५ जूनच्या आसपास पावसाला सुरवात होते. परंतु यंदा पावसाळा लांबल्याने धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. १० जुलैपर्यंत पाऊस न झाल्यास नाशिककरांवर पाणीकपात अटळ राहणार असून, प्रशासनाकडून तशी तयारी सुरू झाली आहे.

पाण्याचा वापर वाढला

मागील वर्षापासून दोनदा लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने या कालावधीमध्ये शहरात पाण्याचा वापर वाढला आहे. सध्या दररोज सरासरी ५२० दशलक्ष लिटर पाणी धरणातून उचलून पाण्याचा पुरवठा केला जातो. पाणीकपात झाल्यास नागरिकांनादेखील पाणी वापरावर निर्बंध आणावे लागणार आहेत.

‘एफएक्यू’

१. शहराला किती धरणांतून पाणी पुरवठा होतो?

- गंगापूर, मुकणे व दारणा या तीन धरणांतून पाणी पुरवठा होतो.

२. पाण्याचे आरक्षण किती दिवसांसाठी असते?

- पाण्याचे आरक्षण २९० दिवसांसाठी असते.

३. शहरासाठी किती पाणी आरक्षित ठेवले जाते?

- शहरासाठी ५,५०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित ठेवले जाते.

४. दिवसाला सरासरी किती पाणीपुरवठा केला जातो?

- सरासरी ५२० दशलक्ष लिटर्स पाणीपुरवठा केला जातो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूने गमावली तिसरी विकेट! आक्रमक खेळणारा रजत पाटिदार आऊट, अर्धशतकही हुकलं

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT