igatpuri12.jpg
igatpuri12.jpg 
नाशिक

हातातोंडाशी आलेला घास हिरावला! भाताच्या आगारात रोगासह निसर्गाचा प्रकोप; शेतकरी संकटात

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (इगतपुरी) तालुक्यात यंदा भात पिकांवर संक्रातच आली आहे. करपा, मावा आदी रोगांनी भाताची शेती वाया गेली, तर निसर्गाचाही प्रकोप वाढला आहे. अतिवृष्टीमुळे भातपीक पाण्यात गेले आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी थेट बांधावर जाऊन भातशेतीची पाहणी करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा आहे.

ऐन काढणीत आलेले भातपीक पाण्यात 

पालकमंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर या लोकप्रतिनिधींनी थेट शेतात जाऊन भातपिकांची पाहणी केली. त्यामुळे आता अपेक्षा आहे ती फक्त मदतीची. इगतपुरी तालुक्यात पावसाच्या हंगामाने सुरवातीपासूनच जोर धरला होता. मुसळधारेमुळे भातपिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. ऐन मोसमात भात सोंगणी होत असताना पावसाने कहर केला आहे. त्यामुळे भातशेती उत्पादनात घट होणार, यात शंका नाही. दोन महिन्यांत तालुक्यात सर्वाधिक पाऊस पडला. २०-२२ वर्षांतील विक्रम मोडीत काढत अतिवृष्टीचा फटका बसला. तालुक्यात चक्क १६० टक्के पाऊस झाल्याची नोंद झाली. त्यामुळे तालुक्यात सुरवातीपासूनच भातपीक पाण्याखाली गेले आहे. त्यातूनही सावरत असताना चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाचा मारा चालू झाल्याने भातपिकाला मोठे नुकसान पोचत आहेत. 

२९ हजार हेक्टर क्षेत्रावर थैमान 

या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी परतीच्या पावसाने व रोगाने २९ हजार हेक्टर क्षेत्रावर थैमान घातले आहे. त्याच पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी प्रयत्न केले आहे. गतवर्षी तालुक्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याने शेतकरी हतबल झाला होता. तीच वेळ आता ओढावत असल्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. यंदा वातावरणाची स्थिती पाहून शेतकऱ्यांनी रब्बी पिके व भाजीपाला पिकांची लागवड केली होती. परंतु मुसळधार पावसाने त्याचेही मोठे नुकसान झाले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT