ONION SENSOR esakal
नाशिक

नाशिकच्या शास्त्रज्ञाने शेतकऱ्यांसाठी शोधले स्मार्ट तंत्र!

अरुण खंगाळ

लासलगाव (जि. नाशिक) : राज्यात शेतकरी राजाचे कांदा हे नगदी पिक. हातात दोन पैसे पडावे म्हणुन गरजेनुसार टप्प्या-टप्प्याने कांदा विक्री करतो. त्यासाठी तो कांदा चाळीत साठवतो पण हे कांदे वातावरणामुळे सडायला लागतात. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यावर नाशिक येथील शास्त्रज्ञ डाॅ. ओमप्रकाश कुलकर्णी यांनी सेंन्सर तयार केला असुन त्याचे प्रात्यक्षिक लासलगांव येथे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे तसेच नाफेड नवी दिल्लीचे संचालक अशोक ठाकुर यांच्यासमोर सादर केले. (Scientists-in-Nashik-invent-smart-machine-for-farmers-nashik-agriculture-news)

नाफेड करणार 'या' तंत्रज्ञानाचा वापर

चुकीच्या साठवणूक पध्दतीमुळे साधरण ३० ते ४० टक्के कांदा सडून जातो अन् शेतकऱ्यांचे नुकसान होते. चाळीमध्ये कांदा सडण्यास सुरुवात झाल्या बरोबर जर शोधता आले तर उरलेला कांदा वाचविता येतो. यातून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येते. या दृष्टीने नाशिक येथील वैज्ञानिक प्रा. डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांनी सेन्सरचा उपयोग करत उपरकण बनवले आहे. अमोनिया, आद्रता आणि गॅस मुळे सडलेला कांदा या उपकरणामुळे शोधून काढता येईल. या उपकरणाचा डेमो नाफेडचे नवी दिल्लीचे संचालक अशोक ठाकूर, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे, लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांना दाखविण्यात आले. नाफेडच्या वतीने हे उपकरण प्रमोट करण्याचे आश्वासन नाफेडचे संचालक अशोक ठाकूर यांनी दिले आहे.
कांदा चाळीत सदरचे उपकरण ठेवून कांद्याची आद्रतेवरून कांदा चाळीत कुठल्या भागात सडला आहे हे उपरकण सेन्सरद्वारे दर्शवितो. या उपकरणामुळे खराब होणारा कांदा तात्काळ लक्षात येऊन तो चाळीतून बाहेर काढून बाकीचा कांदा खराब होण्यापासून वाचविता येईल.

सेंन्सर असे करते काम...

शेतकरी अथवा व्यापारी यांनी साठवलेल्या कांदा चाळीच्या जवळ सदर सेंन्सर बसवावा. कांदा चांगला असल्यास सेंन्सर सायरन देत नाही, कांदा हळुहळु सडायला लागल्यास त्यातील अमोनिया, कार्बन डाय ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड वायु बाहेर पडु लागल्यास कांदा सडायला सुरुवात होते; त्यावेळी सायरन सुरु होतो, त्या चाळीतील कांदा लवकर विक्री करुन नुकसान टाळता येते.
सेंन्सर बनवायला साधारणपणे 15 ते 20 हजार रुपये खर्च असुन बॅटरीच्या सहाय्याने कार्यरत असते. हाताळायला सोपे आहे. नाफेड सारख्या एजन्सी मध्ये याचा वापर झाल्यास नुकसान कमी प्रमाणात होऊ शकते.

''कांदा बाजारभावात तेजीमंदीने येणारे चढ उतार हे पाहून या समस्येवर काही तरी तोडगा काढला पाहिजे असा विचार केला. यांचा अभ्यास करताना असे लक्षात आलं, शंभर किलो कांदा जेव्हा शेतकरी साठवणूक करण्यासाठी गोदामात पाठवतो, तेव्हा त्यातील ३०-४०% कांदा खराब होतो. या समस्येवर उपाय योजना गरजेची आहे हे जाणवलं यातून या उपकरणाची निर्मिती करण्याचे सुचले आणि ते कृतीत उतरविले.'' - प्रा. डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, वैज्ञानिक

(Scientists-in-Nashik-invent-smart-machine-for-farmers-nashik-agriculture-news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025 Final: शफाली वर्माने मॅच फिरवली! बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही ठरतेय भारताची संकटमोचक, घेतल्या दोन विकेट्स

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

Prakash Ambedkar: शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या का?: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका

Bachchu Kadu: भाजपकडून माझ्या बदनामीचा अजेंडा : बच्चू कडू; कर्जमाफीपर्यंत सरकारला सोडणार नाही, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT