Subhash Lamba Statement esakal
नाशिक

Subhash Lamba Statement : खासगीकरणाच्या नावाने देशाच्या संपत्तींची विक्री

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देशात लष्करातील 'अग्निविर' सारख्या कंत्राटी नोकऱ्या आगामी काळात सर्व शासकीय कार्यालयात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता केंद्र शासन विरोधात कामगार व इतर संघटना लढा देत आहेत. या लढ्यात सर्व सामान्य नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारतीय कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांनी केले.

केंद्र शासन खासगीकरणाच्या नावावर देशाची ७० वर्षाची संपत्ती विक्री करीत आहे. रिझर्व बँकेचा फंड देखील शासनाकडून विनाकारण वापरला जात असून, मोठया प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहेत. पंतप्रधान मोदी देशवासियांची दिशाभूल करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत विचारमंथन करून ८ डिसेंबर २०१२ रोजी दिल्ली येथे ताल कटोरा स्टेडियम येथे होणाऱ्या संयुक्त राष्ट्रीय परिषदेत धोरण ठरवविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

औरंगाबाद रोडवरील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम येथे जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे राज्यव्यापी अधिवेशनास शनिवारी (ता.19) सुरूवात झाली. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लांबा यांच्या हस्ते अधिवेशनाचे उदघाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. (Subhash Lamba Statement Selling country wealth in name of privatization Nashik News)

अधिवेशनाचे खासदार हेमंत गोडसे, उन्मेश पाटील, अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे महासचिव ए. श्रीकुमार, आमदार सीमा हिरे, अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वास काटकर, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे, सचिव अविनाश दौंड, महासंघाचे राज्याध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले, सरचिटणीस अशोक थूल, प्रभारी सरचिटणीस संजय महाळंकर, राज्य उपाध्यक्ष शोभा खैरनार, विभागीय उपाध्यक्ष कैलास वाघचौरे, नाशिक जिल्हाध्यक्ष अरुण आहेर, सरचिटणीस महेंद्र पवार, कार्याध्यक्ष डॉ. भगवान पाटील आदी उपस्थित होते. सकाळी कर्मचा-यांची रॅली काढण्यात आली.

अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा आढावा घेतला गेला असून आता त्यावर निर्णायक मार्ग काढण्यात येणार असल्याचेही अध्यक्ष लांबा यांनी सांगितले. दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनासाठी राज्यातील जवळपास बाराशे प्रतिनिधी उपस्थित असून यामध्ये महिला कर्मचाऱ्यांचाही सहभाग लक्षणीय आहे.

खासदार पाटील, गोडसे, आमदार सीमा हिरे यांनी संघटनेचे ठराव शासनदरबारी मांडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. मध्यवर्ती संघटनेचे अविनाश दौड यांनी सांगितले, की संघटनेसाठी स्वर्गीय र. ग. कर्णिक यांचे मोठे योगदान आहे. लीडर आणि केडर दोन्ही घटक महत्वाचे असल्याचे सांगितले. अधिवेशनात पहिल्या दिवशी महिलांचे विशेष चर्चासत्र आयोजीत करण्यात आले होते. कामाच्या जागी येणाऱ्या समस्या, संरक्षण, हक्क अशा अनेक विषयांवर उपस्थित महिला कर्मचाऱ्यांनी आपली मते मांडली. या अधिवेशानात ४४ ठरावावर चर्चा कऱण्यात आली. रविवारी (ता. २०) अधिवेशनाच्या समारोपाला हे ठराव संमत केले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT