Tribals esakal
नाशिक

अतिदुर्गम भागातील आदिवासींची सरकारला आर्त हाक; निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

बोरगाव, ता. सुरगाणा : सरकारनं सांगलं तसं आमी बी घराघरालं झेंड लावलंत. आता आमचंकडे बी जरा लक्ष देजोस सरकार..
एकीकडे भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात झाला. अतिदुर्गम भागात हर घर झेंडा फडकवला गेला; पण अजूनही अतिदुर्गम भागातील आदिवासी समाज मूलभूत सोयी-सुविधांसाठी संघर्ष करावा आहे. आरोग्य, शिक्षण, पूल, वीज, पाणी या समस्यांसाठी झगडावे लागत आहे. या आदिवासी बोलीतील शब्द बरेच काही सांगून जातात...

आमची कामां मंजूर केली नाय.. तर येणाऱ्या चुटणीत (निवडणुकीत) मतदान नाय करजन... आमचं पाड्यावर मत मागायलं येवांच नाय... आलस तर ठेमकं घेण ऊठू... आमची पिढी बरबाद झाली; पण आतापावेतो सुधारणा काहीच झाली नाय... ताहा आता आमी डवरां अन बांडगाही ठरवलांय का आमची पुरी कामा मंजूर नाय झाली त येणाऱ्या निवडणुकीत मत नाय टाकजन...आमचे चार- पाच पाड्यांवर कनचाही पुढारी व पक्ष येतील तर त्याहल उभा राहू देजन नाय..आम्ही पाणी पन पियालं दयाव नाय... जे येतील तेही कशाक काय करतील त्याचा तपास नाय... आम्ही त्याहलं टेमक्याखल लगावत न्यांव... मग तुम्ही आम्हांल सांगसाल.. कशाज ह्यां केलां...पुढा-यांनी आमची कामा नाय केली ताहा आम्ही ठेमकं घेणं उठू...
या आहेत अस्सल आदिवासी कोकणी, डांगी बोली भाषेतील आदिवासी बांधवांच्या तोडूंन निघालेल्या तहसील कार्यालयात विविध प्रकारच्या समस्यांबाबत निवेदन सादर करतांना उमटलेल्या संतप्त प्रतिक्रिया... हे आदिवासी बोल बरेच काही सांगून जातात.

शुक्रवारी (ता. १९) गुजरात बलसाड,धरमपूर सीमेलगतच्या खिरपाडा खो, वांगण खो, सागपाडा, वडपाडा, कहांडोळपाडा खो,खोबळा दिगर या पाड्यावरील ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन दिले, त्यात आम्हाला वेळोवेळी गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने महाराष्ट्र आणि गुजरात सीमेलगतच्या पार नदीवर पूल गरजेचा आहे. नदीच्या पलीकडे गुजरात राज्यात टोकलपाडा, बोरपाडा,भितरुंड, मोहाची माळी,पाचविहरा ही धरमपूर तालुक्यातील गावे आहेत. या गावापर्यंत गुजरात सरकारने पक्की सडक, आरोग्य, वीज,पिण्याचे शुद्ध पाणी,शिक्षण या मुलभूत गरजा आदिवासींना पुरवल्या आहेत. मात्र राज्यातील पाच ते सात पाड्यावरील दोन ते अडीच हजार आदिवासी बांधव अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचितच आहेत. नदीपलीकडे कोणाचा मृत्यू झालाच तर नदीवर पूल नसल्यामुळे जाता येत नाही. पावसाळ्यात खूपच हाल होतात. किराणा घेण्यासाठी जीव धोक्यात घालून पोहत जावे लागते.


शासनाने खिरपाडा ते पाचविहिरा नवीन पूल बांधावा, भेनशेत ते खिरपाडा खो हा १४ किमी रस्त्याचे डांबरीकरण करावे, थ्री फेज वीजपुरवठा सुरळीत करावा, खोबळा दिगर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे, नार-पार नदीवर केटिवेअर सिंमेट बधारे बांधावा, दुर्गम भागात रुग्णवाहिका मंजूर करावी, एसटी सुरु करावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात रमण गोबाले, काळू काळाईत, भाऊराव सानवणे, रघू इजल, गुलाब दोडके, पंडित दोडके, चिंतामण इजल, रमेश तुरे, विजय दोडके, केशव जोगारे, गणपत धाडर, महादु इजल, सुरेश मोहडकर, चंदर काळाईत आदींचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT