water supply  esakal
नाशिक

Nashik : येवल्यात 38 गाव पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा चार दिवस बंद

पाणीपुरवठा योजना समितीने हि माहिती दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : तालुक्यातील ५७ गावे व योजनांची तहान भागविणाऱ्या ३८ गाव पाणीपुरवठा योजनेतून सुरू असलेला पाणीपुरवठा चार दिवस बंद राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा योजना समितीने दिली आहे. (Latest Marathi News)

३८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरळीतपणे कार्यान्वित असून लाभधारक गावांना नियमित सुरळीत स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा सुरु आहे. सध्यास्थितीत पालखेड कालव्याला सोडण्यात आलेले ओव्हरफ्लोचे पाणी आवर्तनातून ३८ गावे योजनेच्या साठवण तलावात पाणी घेणे सुरु आहे. हेर पाणी ओव्हरफ्लोचे असल्याने मातीमिश्रित आहे. त्याअनुषंगाने ३८ गावे योजनेचे बाभूळगाव येथील जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत सिएलफ व

फिल्टर बेड या पाणी शुद्धीकरण यंत्रणेमधून शुद्धीकरण करुन देखील पाणी पुर्णपणे स्वच्छ होत नाही. काही प्रमाणात माती मिश्रीत असल्याने २२ ते २५ जुलै असे चार दिवस पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर करून सहकार्य करावे. पाणीपुरवठा करणाऱ्या यंत्रणेकडे ४ दिवस पाणी मागणी करु नये. माती मिश्रीत पाणी निवळताच २५ जुलैनंतर नियमितपणे पाणी पुरवठा सुरळीत सुरु करण्यात येईल अशी माहितीही देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi : आजीबाईने डिलीट केले १२ व्होट..! अर्ज कोणी केला, काय म्हणाल्या गोडाबाई? राहुल गांधींनी समोर आणला 'घोळ'

Latest Maharashtra News Updates : निवडणूक आयुक्तांना १८ वेळा पत्र पाठवले, तरीही काहीही उत्तर मिळाले नाही

Asia Cup 2024 Super 4 Scenario : भारत, पाकिस्तान यांची जागा पक्की; अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना काय करावं लागणार?

ज्ञानेश कुमार मतचोरांचं संरक्षण करतायत, मी पुराव्याशिवाय बोलत नाहीय : राहुल गांधी

iPhone Air! अ‍ॅपलचा कागदासारखा पातळ स्मार्टफोन; कुणी खरेदी करावा अन् कुणी अजिबात घेऊ नये? एकदा बघाच

SCROLL FOR NEXT