collage exam 3.jpg 
नाशिक

परीक्षेच्या निर्णयाविना सत्रच अडचणीत..सप्टेंबरनंतरच शैक्षणिक वर्ष सुरू होणार?

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनामुळे आगामी शैक्षणिक वर्ष सप्टेंबरमध्ये सुरू करण्यासंदर्भातील संकेत विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)ने दिले आहे. पण परीक्षेशिवाय पुढील वर्षात पदार्पण अशक्‍य असेल, तर अतिरिक्‍त तासिका, डिजिटल कंटेंटद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करण्याशिवाय पर्यायच नाही. 

सप्टेंबर किंवा त्यानंतरच शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची दाट शक्‍यता

लॉकडाउनमुळे यापूर्वीच शालेयस्तरावरील परीक्षा रद्द झाल्या आहेत. मात्र महाविद्यालयीन परीक्षा रद्द करून चालणार नाही. या गुणांच्या आधारे करिअर घडत असल्याने कुठल्याही परिस्थितीत या परीक्षा घ्याव्यात, अशी मागणी सर्व स्तरावर आहे. परंतु परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची संभाव्य गर्दी लक्षात घेता, परिस्थिती नियंत्रणात आल्याशिवाय परीक्षा घेणे अशक्‍य आहे. अशा स्थितीत परिस्थितीचा अंदाज घेत संभाव्य पर्याय सूचविण्यासाठी यूजीसीतर्फे दोन समित्या नेमल्या गेल्या. त्यानुसार सप्टेंबरला शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. अद्याप यावर अंतिम निर्णय झालेला नसला, तरी सप्टेंबर किंवा त्यानंतरच शैक्षणिक वर्ष सुरू होण्याची दाट शक्‍यता आहे. 

प्राध्यापकांना कामाचे तासही वाढवावे लागतील

पुढील शैक्षणिक वर्षाचा कालावधी कमी करण्यात आल्यास विविध सार्वजनिक सुट्या घटवाव्या लागतील. प्राध्यापकांना कामाचे तासही वाढवावे लागतील, अभ्यासक्रम पूर्णत्वासाठी डिजिटल पर्याय, अतिरिक्त तासिकांद्वारे अभ्यासक्रम पूर्ण करावे लागणार आहेत. सहाजिकच त्यासाठी सगळ्या शिक्षण संस्थांकडील पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. 

अशा बदलाची शक्‍यता 
वरिष्ठ महाविद्यालयात पारंपरिक व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अध्ययनासंदर्भात दिशानिर्देश आहेत. त्यानुसार प्राध्यापकांना आठवड्याचा 18 ते 21 तासांचा वर्कलोड असतो. अर्थात प्राध्यापकांना आठवड्याभरात इतके तास अध्ययन करायचे असते. परंतु आता सुट्या कमी होऊन महाविद्यालयाची वेळ वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्राध्यापकांच्या वर्कलोडमध्ये बदल करावा लागण्याची दाट शक्‍यता आहे. 

ऑनलाइन माध्यमातून अध्ययन प्रक्रिया सुरू
सध्याच्या परिस्थितीत महाविद्यालये बंद असली तरी ऑनलाइन माध्यमातून अध्ययन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुसान होणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे. विद्यार्थ्यांच्या करिअरच्या अनुषंगाने परीक्षा महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे परीक्षा कधी होतात, त्यानंतरच पुढील शैक्षणिक वर्षाबाबत स्पष्टता येऊ शकेल. - प्राचार्य डॉ. एस. एन. शिंदे, सीएमसीएस महाविद्यालय 

हेही वाचा > रंगात आला डाव...पण पोलिसांना बघून टांगा पलटी घोडे फरार...अन् मग चांगलीच झाली फजिती!
दैनंदिन तासिकांची संख्या वाढवावी लागण्याची शक्‍यता
परीक्षा व पुढील शैक्षणिक वर्षाच्या कार्यप्रणालीबाबत राष्ट्रीयस्तरावर एकसूत्री धोरण जाहीर केले जाईल. लॉकडाउन शिथिल केले, तर अंतिम टप्प्यात शैक्षणिक संस्था सुरू केल्या जातील. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम शिकविण्यासाठी सुट्या कमी करण्यासह दैनंदिन तासिकांची संख्या वाढवावी लागण्याची शक्‍यता आहे. - प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर, अध्यक्ष, अभ्यास मंडळ, पुणे विद्यापीठ  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT