suicide esakal
नाशिक

अतिवृष्टीने झालेले नुकसान असह्य; महिलेने केले विषप्राशन

शशिकांत पाटील

न्यायडोंगरी (जि.नाशिक) : काबाडकष्ट अन् मेहनत करून शेती फुलवली...पण नियतीला ते मान्य नव्हतं. एकतर आधीच कोरोनाच्या संकटामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला पण आता अचानक आलेल्या अतिवृष्टीमुळे भयंकर नुकसान झाले अन् तिचा धीर सुटला....

पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान

न्यायडोंगरी येथे मंगळवारी (ता. ७) सप्टेंबरच्या मध्यरात्री झालेल्या अतिपावसाने महादेव डोंगर रांगेतील परधाडी येथील कोल्ही नाल्यास मोठ्या प्रमाणावर पूर गेल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले होते व पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेले मका व कपाशी पीक भुईसपाट झाल्यामुळे मंदा भाऊसाहेब काकळीज या शेतकरी महिलेने आपली जीवनयात्रा संपवली. अतिवृष्टीमुळे नांदगाव तालुक्यातील शेतीचे नुकसानीचे स्वरूप गंभीर असल्याचे या घटनेमुळे अधोरेखित होत आहे. मंदाबाई यांच्या मागे दोन मुले, सुना, एक मुलगी पती व सासू असा परिवार आहे. अतीवृष्टीमुळे शेतच वाहून गेल्याने खचलेल्या पन्नास वर्षीय शेतकरी महिलेने विषप्राशन केले. अतिवृष्टीने कोल्ही नाल्याचे पाणी शेतात शिरून तब्बल १२ एकर शेतीतील मका व कपाशी पिके भुईसपाट झाल्याने यांनी विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना न्यायडोंगरी येथे घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sabarimala temple gold scam: सबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ED'ची मोठी कारवाई ; तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी

"आईच्या दुसऱ्या लग्नामुळे सावत्र भावंडं मिळाली पण.." गिरीजा ओकने उलगडलं भावा-बहिणीबरोबरच तिचं नातं

देशातील मोठ्या बँकेत नोकरीची संधी, ३५० जागांसाठी होणार भरती; पात्रता फक्त पदवी, कसा करायचा अर्ज?

Ratha Saptami 2026: यंदा रथ सप्तमी कधी आहे? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि म्हणायचे मंत्र

प्रेक्षकांना कसा वाटला स्टार प्रवाहची नवी मालिका 'तुझ्या सोबतीने' चा पहिला भाग? म्हणतात- असंच दिग्दर्शन राहिलं तर...

SCROLL FOR NEXT