ZP CEO Ashima Mittal, Nashik News esakal
नाशिक

World Water Day | हर घर जल गाव व हागणदारीमुक्त-अधिक गावांची घोषणा करावी : ZP CEO आशिमा मित्तल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जागतिक जल दिन २२ मार्चचे औचित्य साधून ज्या गावांमध्ये जल जीवन मिशनचे काम पूर्ण झाले ते गाव हर घर जल घोषित करावे.

तसेच हागणदारी मुक्त अधिक गावाच्या निकषाची पूर्तता करणाऱ्या गावास हागणदारीमुक्त अधिक गाव म्हणून घोषित करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी यंत्रणेस दिले आहेत. (ZP CEO Ashima Mittal statement Every Ghar Jal Gaon and Hagandari Mukta should be announced Nashik News)

जागतिक जल दिनानिमित्त केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाने जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामे पूर्ण झालेल्या गावांना हर घर जल गाव व हागणदारीमुक्त अधिक गाव म्हणून घोषित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जल जीवन मिशनच्या निकषानुसार गावातील कार्यात्मक घरगुती नळ जोडणी तसेच शाळा, अंगणवाडी, मिशन या सार्वजनिक संस्थांना नळजोडणी पूर्ण केलेल्या व नळ जोडणी द्वारे नियमित पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गावांना हर घर जल म्हणून घोषित करण्यात येते.

हेही वाचा : अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य....

तसेच हागणदारीमुक्त अधिक गाव अंतर्गत शौचालयांचा नियमित् वापर, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन या निकषांची पूर्तता केल्यास गाव हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित करण्यात येते. त्यानुसार नाशिक जिल्हयात आत्तापर्यंत १०२ गाव हर घर जल म्हणून तर २०८ गाव हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

जलदिनाच्या अनुषंगाने निकष पूर्ण करत असलेल्या गावांना हर घर जल व हागणदारीमुक्त अधिक गाव म्हणून गाव घोषित करण्याचे आवाहन आशिमा मित्तल यांनी केले आहे. या बाबत सर्व गटविकास अधिकारी यांना लेखी सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Middle Class: 5 मिनिटांत बँक बॅलन्स 43,000 रुपयांवरून 7 रुपयांवर आला; भाड्यापासून ते EMIपर्यंत.. मध्यमवर्ग आर्थिक संकटात

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

Supreme Court: सरकारी बंगला रिकामा करून ताब्यात घ्या; माजी सरन्यायाधीशांच्या निवासस्थानाबाबत न्यायालयाचे पत्र

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

SCROLL FOR NEXT