onion.jpg 
उत्तर महाराष्ट्र

काकस्पर्शाने कांद्याला कोटींची कमाई !

प्रशांत बैरागी, सकाळ वृत्तसेवा

प्रशांत बैरागी : सकाळ वृत्तसेवा 

नामपूर : आपल्या पूर्वजांच्या स्मृतीना उजाळा देणारा पितृपक्ष पंधरवडा घरोघरी होत असला तरी धार्मिकदृष्टया अशुभ काळ मानला जातो. त्यामुळे उद्योग व्यवसाय ठप्प झाल्यामुळे ग्रामीणपासून शहरी भागातील व्यावसायिक मंदीचा सार्वत्रिक अनुभव घेतात. अशा पितृपक्षाच्या कालावधीत काकस्पर्शाने जिल्हयातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर उमटली आहे. यंदाच्या पितृपक्ष सप्ताहात कांद्याच्या विक्रीतून जिल्हयात सुमारे दोनशे कोटी रूपयांची आर्थिक उलाढाल झाल्याने शेतकरी समाधानी दिसत आहे. 

गेल्या तीन वर्षापासून सातत्याने कांद्याच्या दरांनी झळ खाणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यंदाही विक्रमी उन्हाळ कांदा लागवड करून सुरुवातीला काही माल विकून सुमारे 60 टक्के माल चाळीमध्ये साठविला होता. मोठय़ा कष्टाने शेतक-यांनी कांद्याचे उत्तम प्रकारे उत्पादन घेतले आहे. यंदा सर्वत्र शेतकर्यांना कांद्याचे उत्पादन चांगले आले आहेत. कांदा लावणीपासून ते कांदा चाळीभरेपर्यंत मोठय़ा प्रमाणात खर्चाला शेतक:यांना सामारे जावे लागते. मात्र गेल्या तीन वर्षापासून कांद्याचे भाव उतरल्याने शेतक:यांना खर्च निघणे अवघड झाले होते. परंतु यंदा प्रथमच झालेल्या भाववाढीने शेतकरी सुखावला आहे. 

जिल्हयातील बाजार समितीत कांदा विक्रीसाठी दररोज सरासरी 50 ते 55 हजार कविंटल कांदा विक्रीसाठी आणले जात आहे. परंतु, गेल्या चार पाच महिन्यात भावच नसल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावाने कांदा विकावा लागला आहे. भाविष्यात कांद्याला चांगले भाव मिळतील, या हेतूने अनेक शेतकरी कांदा चाळीत साठवुन ठेवला होता. शहरी भागातील नागरिकांनी कांदादर वाढीचा बाऊ करू नये, अशी अपेक्षा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. यंदाही कांद्याला भाव नसल्याने कांदा चाळीत ठेवण्याची वेळ आली आहे

मोसम खोऱ्यात शेतकर्‍यांनी उन्हाळ कांदा लागवडीसाठी एकरी 40 ते 45 हजार रुपयांपर्यंत खर्च केला. कांद्याचे उत्पादन पदरात पडेपर्यंत क्विंटलला सरासरी एक हजार 200 रुपये खर्च झाला. यंदाच्या रोगट हवामान, गारपीट, अवकाळी पाऊस, यामुळे कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्याचे बाजारभाव बघता उत्पादन खर्चही भागणार नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. शासनाने तत्काळ उत्पादन खर्चावर आधारित बाजारभावाचे नियोजन करावे किंवा शेतकर्‍यांना नुकसानभरपाईपोटी उत्पादन खर्चाइतके अनुदान द्यावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

प्रतिक्रिया 
देशांतर्गत बाजारपेठेत कांदा संपुष्टात आल्याने कांद्याचे दर वधारले आहेत. डिसेंबर पर्यन्त लाल कांदा बाजारपेठेत येईल तोपर्यंत दर टिकून राहतील. दक्षिण भारतात झालेल्या पावसाने कांद्याच्या भावात वाढ आहे. देशात मागणी वाढल्याने केवळ बांग्लादेशात कांदा निर्यात सुरु आहे. शेतकऱ्यांनी टप्पाटप्पाने माल विक्रीस आणावा.
- सोहनलाल भंडारी, अध्यक्ष नाशिक जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशन 


कांद्याची मागणी व पुरवठा यांचे प्रमाण व्यस्त झाल्याने कांदा वधारला आहे. कांदा हवामानावर आधारीत पीक असल्याने दुष्काळी परिस्थितीमुळे भविष्यात अजून कांद्याच्या दरात सुधारणा होईल. बाजारात मोठी मागणी असल्याने केंद्र सरकारच्या निर्यात धोरणाचा फारसा परिणाम कांद्याच्या दरावर होणार नाही. 
- दिपक चव्हाण, शेतमाल बाजारभाव अभ्यासक
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC T20I Rankings: वरूण चक्रवर्थीने मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम; आता टार्गेटवर शाहिद आफ्रिदी...

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

Leopard Attack : बिबट्यापुढे धाडसी मातेचे शौर्य ठरले व्यर्थ; डोळ्यांदेखत पोटच्या गोळ्याला नेले फरपटत; हंबरड्याने पाणावले उपस्थितांचे डोळे

एपस्टिन फाइलमध्ये आहे तरी काय? भारतासह जगभरातील नेते अन् उद्योगपतींनी घेतलाय धसका

Latest Marathi News Live Update : पुण्यातील ड्रग्स तस्करने घरातच उभारली प्रयोगशाळा

SCROLL FOR NEXT