water tank
water tank esakal
उत्तर महाराष्ट्र

पावसाळ्यात ११५ पावसाची टक्केवारी असूनही 3 गावांना टँकरने पाणी

देविदास वाणी

जळगाव : यंदा पावसाळ्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाली. धरणे ओव्हरफ्लो वाहिली. नद्या, नाले ओसंडून वाहिली. काही गावात अद्यापही नद्यांना पाणी आहे. पावसाळ्यात ११५ टक्के पाऊस पडल्याची नोंद आहे. असे असताना जिल्ह्यात चाळीसगाव तालुक्यात दोन टँकर तर कंडारी (ता. भुसावळ) येथे एक असे तीन टँकर सुरू करण्यात आले आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे पाणीटंचाई सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. (water scarcity started Due to the rising heat)

जिल्हा प्रशासनानेही यंदा पाणीटंचाई (water scarcity) जाणवणार नसल्याचे गृहित धरले होते. असे असले तरी एनवेळी टंचाई जाणवलीच तर पंचायत नको म्हणून २०२१-२२ या टंचाई कालावधीत ५०५ गावांकरिता ३ कोटी ११ लाख रुपयांचा संभाव्य कृती पाणीटंचाई आराखडा तयार केला आहे. एकूण १६ गावात विहीर अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यात जामनेरला सहा, एरंडोलला दोन, भुसावळला दोन, मुक्ताईनगर एक, चाळीसगाव दोन, भडगाव दोन, पारोळा एक या गावांचा सामावेश आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव, हातगाव या २ गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर कंडारी (ता. भुसावळ) येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT