49 thousand farmers to get help before Diwali in yavatmal 
विदर्भ

खुशखबर! दिवाळीपूर्वी ४९ हजार शेतकऱ्यांना मिळणार मदत

चेतन देशमुख

यवतमाळ : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यात 34 हजार हेक्‍टरवरील क्षेत्र बाधित झाले आहे. तब्बल 49 हजार 256 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यांत दिवाळीपूर्वीच रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार असल्याने काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागला. कोरोनाचा उद्रेक असल्यामुळे पेरणीमध्ये अनेकदा व्यत्यय आला. त्यातच पेरणी सुरू केल्यानंतर सोयाबीनचे बियाणे बोगस निघाल्याने दुबार, तिबार पेरणी करावी लागली. पेरण्या कशाबशा आटोपल्या असतानाच जून ते ऑगस्ट या कालावधीत पावसाने थैमान घातले. त्यामुळे दारव्हा व नेर या तालुक्‍यांतील शेतपिके खरडून गेलीत. विविध तालुक्‍यांतील पिकांनादेखील फटका बसला. या संकटांतून शेतकरी बाहेर येत नाहीत व पिके जोमात असतानाच ऐनकाढणीच्या वेळी सप्टेंबर व ऑक्‍टोबर या महिन्यांत पावसाने झोडपून काढले. संततधारमुळे सोयाबीनला अक्षरक्षः कोंब फुटलीत, तर कापसाची बोंडेही सडली.

कापूस, सोयाबीनसोबतच तूर, उडीद, मूग या शेतपिकांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने जून ते ऑगस्ट या कालावधीत नुकसानग्रस्त शेतपिकांची पाहणी केली. त्यात बाधित क्षेत्र दोन हजार 926 हेक्‍टर एवढे आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यांतील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 14 तालुक्‍यांमधील शेतपिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. त्यामध्ये 34 हजार हेक्‍टर खरिपाचे क्षेत्र बाधित झाल्याचे समोर आले आहे. अतिवृष्टीमुळे 49 हजार शेतकऱ्यांना फटका बसला आहे. प्रशासनाने 24 कोटी 27 लाख 43 हजार रुपयांचा मदतनिधी मागणीचा प्रस्ताव पाठविला होता. शासनाने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान प्रचंड असले तरी मदतीमुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे.

तालुकानिहाय शेतकऱ्यांची संख्या -

  • कळंब-268
  • घाटंजी-96
  • राळेगाव-1,762
  • दारव्हा-24,185
  • नेर-621
  • बाभूळगाव-745
  • पुसद-300
  • दिग्रस-8,935
  • उमरखेड-2,863
  • महागाव-6,389
  • पांढरकवडा-247
  • वणी-1,592
  • मारेगाव-434
  • झरी-235

आचारसंहितेची अडचणी येण्याची शक्‍यता कमी -
अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे अमरावती विभागात आचारसंहिता लागू आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्यात अडचणी येईल, अशी चर्चा आहे. मात्र, शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहता अडचण येणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पोहोचण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

Pune Kondhwa Rape Case : पुणे 'कुरियर बॉय' बलात्कार प्रकरण; आरोपीस अटक अन् धक्कादायक माहितीही उघड!

IND vs ENG 2nd Test: २४ वर्षांच्या पोराचे शतक! जेमी स्मिथ-हॅरी ब्रूक्सच्या खेळीने इंग्लंडचा पलटवार; गौतम गंभीरचा फसला प्लॅन

SCROLL FOR NEXT