पाच पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वानखडे ते ठोंबरे कुटुंबातील स्त्रिया. 
विदर्भ

नात्यांमधील वीण घट्ट : पाच पिढ्यांच्या लेकींचा अनोखा संगम

गणेश राऊत

नेर (जि. यवतमाळ) : हल्लीचे युग इंटरनेटचे... प्रत्येकाच्या हातात मोबाईल... स्क्रीनवरून नजर जरादेखील हटत नाही... आपल्याच जिवलगांकडे बघण्याची फुरसत नाही... इंटरनेटच्या या आभासी मायाजालात जगणेच विसरलो आहे... पणजी-पणजोबा, आजी-आजोबा, आई-बाबा या नात्यांची वीण इंटरनेटने सैल केली आहे. मात्र, आजही काही कुटुंबे नाते घट्ट टिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सणासुदीच्या निमित्ताने का होईना तालुक्यातील कारखेड येथे चार कुटुंबातील पाच पिढ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रियांनी एकत्र येऊन नात्यांमधील वीण घट्ट करण्याचा केलेला प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे. (A-unique-confluence-of-five-generations-in-Yavatmal)

नाते कोणतेही असो त्यात प्रेम व जिव्हाळा असतोच. पिढ्यांपिढ्यांची नाती जपणारी माणसे आजही पाहायला मिळतात. त्यात पाच पिढ्यांच्या लेकींच्या एकत्र भेटीचा योग दुर्मिळच! नेर तालुक्यातील कारखेडा येथे गोविंदराव वानखडे यांचे कुटुंब राहते. गोविंदराव यांचे पुत्र गुलाबराव वानखडे हे धार्मिक वृत्तीचे सद्गृहस्थ होते. त्यांच्या सुविद्य पत्नी नर्मदा आजही वानखडे कुटुंबाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. नुकतेच या कुटुंबातील खापरपणजी व नातीच्या झालेल्या अविस्मरणीय भेटीने जुन्या नात्यांना उजाळा मिळाला. यावेळी चार पिढ्या एकत्र आल्या होत्या.

वयोवृद्ध खापरपणजी श्रीमती नर्मदा गुलाबराव वानखडे (कारखेड, ता. नेर), पणजी सौ. अनसूया आरेकर (महागाव कसबा, ता. दारव्हा), आजी सौ. सुनंदा गिऱ्हे (हिवरखेड, ता. तेल्हारा) आई सौ. मंजिरी ठोंबरे (रा. मोर्शी) यांच्यासह पाचव्या पिढीची प्रतिनिधी चिमुकली मनस्वी ठोंबरे हिनेदेखील हा सुखद भेटीचा क्षण अनुभवला. चारही कुटुंबांसाठी हा औत्सुक्याचा विषय होता. त्या पाच जणी आपल्या पिढ्यांचे प्रतिनिधित्व करीत एकत्र आल्या तेव्हा आनंदाला उधाण आले.

तब्बल पाच पिढ्यांमधील अंतर खूप मोठे आहे. प्रत्येक पिढीचा काळ वेगवेगळा आहे. त्या काळातील राहणीमान, उपलब्ध सोयी सुविधा, संस्कृती यात मोठे बदल झाले आहे. जेव्हा या पाचही पिढ्यांमधील सर्व जणी एकत्र आल्या तेव्हा त्या आठवणींमध्ये रमून गेल्या होत्या. गप्पांची मैफल रंगली. खापरपंजीकडून चारोळ्या तर चिमुकल्या नातीकडून गाण्यांची जुगलबंदी कुटुंबाला अनुभवता आली. हे पाहुणपणाची भेट त्या पाच पिढ्यांच्या संगमामुळे नात्यांमधील वीण घट्ट करणारी ठरली.

कुटुंबीयांसोबत राहा!

मोबाईलने क्रांती केली खरी पण चार भिंतीतच दुरावाही निर्माण केला आहे. नात्यातील ओलावा कमी होत आहे. एकाच कुटुंबातील आई, बाबा व मुले मोबाइलमध्ये इतके व्यस्त असतात की, त्यांना एकमेकांशी संवाद साधायला वेळ नाही. कमालीचा भावनिक दुरावा निर्माण झाला आहे. इंटरनेटच्या आभासी जगात न राहता कुटुंबीयांसोबत राहण्याचे आवाहन मंजिरी ठोंबरे यांनी केले.

(A-unique-confluence-of-five-generations-in-Yavatmal)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anantnag Attack: जम्मू-काश्मीर पुन्हा हादरलं! अनंतनागमध्ये दहशतवादी हल्ला; पोलीस जवान शहीद, हल्ल्याची जबाबदारी कुणी स्वीकारली?

CJP Protest Delhi : आता चर्चा जंतर मंतरवरच! अन्यथा...; CJPची मोठी अट, काय म्हणाले?

Live Updates Marathi : उजनी धरणातून भीमा नदीत ३५०० क्युसेक ने विसर्ग सुरू

भारतीय संघात स्थान मिळत नाही म्हणून, कुलदीप यादवने निवडली दुसरी वाट! आता 'या' परदेशी संघासाठी खेळणार पाच वन डे सामने

Loni Kalbhor Accident: भरधाव ट्रकने धडक दिल्याने ७२ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी; चालकावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT