aditya thakrey 
विदर्भ

"कीचड करून कमल खिलवने', बरं नव्हं 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विरोधी पक्षाकडून गेल्या तीन दिवसांपासून सभागृहात केवळ गोंधळ सुरू आहे. असे म्हणतात की, "कीचड मे कमल खिलता है' पण आधी "कीचड' करा व नंतर कमल खिलवा, ही भूमिका बरोबर नसल्याचे शिवसेना युवाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. हे सरकार "कॉमन मिनिमम प्रोग्राम'वर आधारित असले तरी, ग्रामीण आणि शहरी भागातील विकासासाठी "कॉमन मॅक्‍झीमम प्रोग्राम' हाच मुख्य एजेंडा असल्याचे मत शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना व्यक्त केले. 

पहिल्याच भाषणात विरोधकांचा समाचार 
आपल्या पहिल्याच भाषणात त्यांनी सरकारची भूमिका मांडून विरोधकांचा समाचार घेतल्याचे दिसून आले. आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या दोन दिवसांत सभागृहात होणारा गोंधळ बघत आहे. विरोधी पक्षाकडून घालण्यात येणाऱ्या गोंधळाने मुद्यावर चर्चा होताना दिसत नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी सगळे आमदार विधानसभेत आलेलो आहेत. प्रत्येकालाच महाराष्ट्र माहिती आहे. येथील युवकांच्या हाताला काम हवे आहे. मात्र, सध्याची शिक्षणपद्धती लक्षात घेता, त्यांना रोजगार मिळणार नाही. त्यामुळे शिक्षणपद्धती आणि त्यातील साधनसुविधांमध्ये बदल घडवावा लागेल. समान दर्जा, समान शिक्षण गावपातळीवर पोहचवावे लागणार आहे.

शाळांमध्ये र्व्हच्युअल क्‍लासरूम, डिजिटल शिक्षणाची सोय उपलब्ध करून द्यावी लागेल. याशिवाय प्राथमिक आरोग्याच्या सुविधा, जिल्हास्तरावर रुग्णालये आणि सुपरस्पेशालिटी रुग्णालये तयार करण्यात येईल. यातील सर्वात महत्त्वाचा घटकाला किमान किमतीत जेवण देण्यासाठीच दहा रुपयांत थाळी आणि 1 रुपयात आरोग्य तपासणी देत महाराष्ट्राला पुढे नेण्याची वचनपूर्ती या अभिभाषणातून करण्यात आल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 

भाजप आमदारांची वेलमध्ये घोषणाबाजी 
नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यात लागू करू नये अशी मागणी आमदार अशोक चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत केली. यावरून भाजप आमदारांनी घोषणाबाजी करीत वेलमध्ये गोंधळ घातला. नागरिक सुधारणा विधेयक लोकसभा व राज्यसेत पारित झाला आहे. अशा स्थितीत आमदार अशोक चव्हाण यांनी राज्यात हा कायदा लूान करू नये असा प्रस्ताव मांडला. या विधेयकावरून देशात व महाराष्ट्रात निदर्शने होत असल्याने त्यांनी सांगितले. यावर सुधीर मुनगंटीवर यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला. "संविधान का यें अपमान नही सहेगा हिंदुस्तान' आशा घोषणा देण्यात आला. गोंधळ वाढल्याने दाहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले होते. 

अधिवेशनात दोन दिवसांपासून विरोधकांचा गोंधळ सुरू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर व नागरिक सुधारणा विधेयकावरून पहिला दिवस गाजला. दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांना हेक्‍टरी 25 हजार रुपये देण्याच्या मागणीवरून कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. तिसऱ्या दिवशीची सुरवातही याच मुद्‌द्‌यावरून झाली. भाजप आमदारांनी पायऱ्यांसमोर आंदोल करीत शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT