विदर्भ

अहेरी तालुक्यातील विकासाच्या वाटेवरच भगदाड; पूल तर तयार पण प्रशासनाचं दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

अहेरी (जि. गडचिरोली) : अहेरीलगत (Aheri district) वांगेपल्ली येथे प्राणहिता नदीवर तेलंगणाला (Telangana state) जोडणाऱ्या पुलाची निर्मिती झाली तेव्हापासून या मार्गावरून ये-जा प्रचंड वाढली असून हा मार्ग अहेरी तालुक्याच्या विकासाचा मार्ग मानला जाऊ लागला. पण, आता याच मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठी भगदाडे पडली असतानाही प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याने संताप व्यक्त होत आहे. (Administration in gadchiroli ignoring bad condition of bridge)

महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांतील नागरिकांचे एकमेकांशी नातेसंबंध आधीपासूनच होते पण, पूल निर्मितीनंतर येरझारा वाढल्या. पुलाच्या निर्मितीचा खूप मोठा फायदा अहेरीच्या बाजारपेठेलाही झालेला आढळतो. तेलंगणातील बेज्जुर, मानेपल्ली आणि पेंचीकलपेठ या तीनही तालुक्यांतील 30 ते 40 गावांना अहेरीची बाजारपेठच जवळ पडते. त्यामुळे अहेरीच्या बाजारपेठेत प्रचंड तेजी दिसत आहे.

किराणा असो की कृषी केंद्र असो वा सराफाची दुकाने आणि दवाखाने असोत, सर्व तेलंगणाच्या नागरिकांनी गजबजलेली आढळतात. शिवाय वांगेपल्ली मार्गावरील जमिनींचे भावसुद्धा वधारले आहेत. त्यामुळे त्या मार्गाला अहेरीच्या समृद्धीचा मार्ग म्हटले जाऊ लागले. पण, आता याच मार्गावर भगदाड पडले आहेत. विशेष म्हणजे अहेरीसाठी अतिशय उपयुक्त ठरलेल्या या पुलाची निर्मिती मात्र तेलंगणा सरकारने केली. एवढेच नव्हे तर वांगेपल्ली गावापर्यंत मोठा मार्गसुद्धा तेलंगणा राज्य सरकार बनविणार होते. परंतु त्यासाठी लागणारा अधिग्रहणाचा खर्च तेलंगणा सरकार करणार होते.

महाराष्ट्र सरकारच्या उदासीनतेमुळे अधिग्रहणाची प्रक्रिया झालीच नाही. तेलंगाना सरकार उपलब्ध असलेल्या रस्त्याचीच दुरुस्ती करून मोकळे झाले. तेथून मुख्य मार्गाला जोडणारा पोचमार्ग निर्माण होणे खूपच गरजेचे झाले. त्यासाठीसुद्धा महाराष्ट्र शासनाची तयारी दिसत नाही. आज त्या मार्गावरील कल्वर्टला मोठे भगदाड पडल्याने आवागमनाला अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे या बाजूने होणारी वाहतूक पावसाळ्यात बंद पडेल व एवढा मोठा पूल निरुपयोगी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आंदोलनाचा इशारा

येथे थेट पोचमार्ग नसल्याने गावातील रस्त्याची धुळधाण झाली असून वाढलेल्या जड वाहतुकीने वांगेपल्लीचे गावकरी त्रस्त झाले आहेत. घरात सर्वत्र धूळ होत आहे व रस्त्यावर जनावरांनासुद्धा धोका निर्माण झाला आहे. मुख्य रस्त्याला जोडणारा थेट पोचमार्ग लवकरात लवकर निर्माण करावा, अशी मागणी वांगेपल्लीचे नागरिक करत आहेत. मागणी पूर्ण न झाल्यास चक्काजामसारखे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

(Administration in gadchiroli ignoring bad condition of bridge)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT