विदर्भ

बुलडाण्यात बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी खुली केली होती 'ही' विहीर

दिपाली सुसर

बुलढाणा : हे छोटसं गाव महाराष्ट्राच्या विदर्भातील अमरावती विभागतल्या बुलढाणा जिल्ह्यात उत्तरेस आहे. संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा (Paturda) हे गाव सातपुडा पर्वतरांगांच्यामध्ये वसलेलं आहे. पातुर्डा या गावाला महामानव डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जुना आड म्हणजे विहीर (Well) आहे. या हाताने विहिरीतून पाणी काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या मायबाप जनतेला पाजले होते. पातुर्डा या गावाला सामाजिक वैचारिक इतिहास लाभला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी राहतात. (Dr. Babasaheb Ambedkar Jayanti)

या गावाला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संत तुकडोजी महाराज, महात्मा फुले यांचे पदस्पर्श लाभून या गावाची भूमी पावन झाली आहे. संग्रामपूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या पातुर्डा गावात शाळा, बाजार यांसह अनेक धार्मिक मंदिरे आहेत. तसेच इतिहासकालीन प्राचीन अनेक स्थळेसुद्धा आपली इतिहासाची साक्ष देत उभी आहेत. यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यांसाठी खुली करून दिलेली विहीर हे मुख्य ठिकाण आहे. पातुर्डा येथील जनतेतील ठराविक लोक पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड तरसलेले होते. मायमाऊल्यांची पिण्याचे पाणी आणायची प्रचंड वणवण होत होती. डॉ. बाबासाहेबांनी ही विहीर खुली केली होती.

29 मे 1929 रोजी मध्य प्रांत व वऱ्हाड अस्पृश्य परिषदेचे हे दोन दिवसीय अधिवेशन होते. या अधिवेशनासाठी डॉ. बाबासाहेब पातुर्डा येथे आले होते. तेव्हा ते अधिवेशनाचे अध्यक्ष होते. यावेळी त्यांच्यासोबत रा.पी मटकर, सोनोने, मकेसर, केशवराव खंडारे, संभाजी जाधव, रायभान इंगळे आदी लोक उपस्थित होते. या अधिवेशनासाठी विदर्भातून असंख्य जनसमुदाय जमला होता.

या ऐतिहासिक विहिरीविषयीची सविस्तर माहिती बुलडाण्याच्या प्रसिद्ध मराठी कवयत्री प्राचार्य डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे यांंनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT