cold war between police inspector for local crime branch in chandrapur 
विदर्भ

खुर्चीसाठी प्रवास 'खर्च'; स्थानिक गुन्हे शाखेच्या खुर्चीसाठी पोलिस निरीक्षकांत रंगणार शीतयुद्ध

प्रमोद काकडे

चंद्रपूर : ठाणेदारांच्या जिल्हातंर्गत बदल्यांमध्ये मोठा 'अर्थ'पूर्ण व्यवहार झाल्याने वादग्रस्त अधिकाऱ्यांची महत्त्वांच्या जागी वर्णी लागली, अशी चर्चा आता पोलिस वर्तुळात रंगली आहे. दारूबंदीमुळे काही विशिष्ट शाखा आणि पोलिस ठाण्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे बदली होऊन गेलेले अधिकारीही  'लॉबिंग' करून चंद्रपुरात परतले. आता स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी बाळासाहेब खाडे यांना मिळाली आहे. परंतु, याच पदावर आणखी काही पोलिस निरीक्षकाचा डोळा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात स्थानिक गुन्हे शाखेच्या खुर्चीसाठी पोलिस निरीक्षकांत चांगले शीतयुद्ध रंगणार आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीच्या पार्श्‍वभूमीवर काही महिन्यांपूर्वी रीतसर बैठका घेऊन अवैध दारूविक्रीचे अलिखित परवानेच वाटण्यात आले. पोलिस, राजकीय नेत्यांचा वाटाही यात ठरविण्यात आला. सर्वकाही सुरळीत सुरू होते. तत्पूर्वीच पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांची बदली झाली. त्यानंतर अरविंद साळवे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांचा कार्यभार सांभाळला. साळवे यांनी जिल्ह्यातील दारूतस्करांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी चार विशेष पथक स्थापन केले. या पथकाचे पुढे काय झाले, हे आता सावळेच सांगू शकतील. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे ओमप्रकाश कोकोटे यांचा बदली कार्यकाळ पूर्ण झाला. त्यांची बदली होणार, हे गृहीत धरूनच या पदासाठी काहींनी राजकीय नेत्यांचे उंबरठे झिजविणे सुरू केले. यात ब्रह्मपुरीचे ठाणेदार खाडे यांनी बाजी मारली.  ब्रह्मपुरीचे ठाणेदार असलेले खाडे आधी बल्लापुरात जायला इच्छुक होते. परंतु, त्यांची पोलिस दलातील 'दैदीप्यमान' कारकीर्द बघता स्थानिक आमदारांनी त्यांना 'रेड सिग्नल' दाखविला. शेवटी खाडे यांना चंद्रपूरचा प्रवास "खर्च' परवडला आणि ते येथे आले. 

दारूबंदीच्या जिल्ह्यात दारूपुरवठ्याची अघोषित जबाबदारी वणी येथील दारू व्यावसायिकांनी घेतली आहे. घुग्घुसमार्गे चंद्रपुरात दारू येते. हे आता पोलिसही नाकारत नाही. याच घुग्घुसचे कधीकाळी सुधाकर अंभोरे ठाणेदार होते. त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचाही भार सांभाळला आहे. दारूबंदीत घुग्घुसचे महत्त्व आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या जबाबदारीची त्यांना चांगलीच "जाणीव' आहे. ते दोन वर्षांपूर्वीच नागपूर ग्रामीण पोलिस दलात बदली होऊन गेले. मात्र, तिथेही असतानाही त्यांचा चंद्रपूरसाठी जीव तुटत होता. अंभोरेही यांनीही शेवटी नागपूर-चंद्रपूरचा मार्ग मिळाला आणि ते आले.

तत्पूर्वीच खाडे यांनी रात्री 12 वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखाची खुर्ची ताब्यात घेतली. त्यामुळे आता अंभोरे "वेट ऍण्ड वॉच'च्या भूमिकेत आहेत. त्यांना जिल्ह्यातील दारू व्यावसायिकांची खडानखडा माहिती आहे. या ओळखीचा भविष्यात वरिष्ठ अधिकारी "उपयोग' करून घेता येईल, अशी आशा अंभोरे यांना आहे. पवनीतून ब्रह्मपुरीमार्गे दारूचा पुरवठा होतो. त्यामुळे दारूबंदीसाठी ब्रह्मपुरी महत्त्वाचे जंक्‍शन आहे. इथेच खाडे होते. आता त्यांच्या जागेवर नागपूर पोलिस  (ग्रामीण) मलिक्कार्जुन इंगळे यांची वर्णी लागली. इंगळे दोन वर्षांपूर्वी सिंदेवाहीत ठाणेदार होते. त्यांनाही या जिल्ह्यातील ठाणेंच्या 'महत्त्व' माहिती आहे. त्यामुळे इंगळेही नेहमीच चंद्रपूरच्या आठवणीने व्याकूळ व्हायचे. अखेर त्यांनी बरेच 'परिश्रम' करून ब्रह्मपुरी गाठलेच. 

दरम्यान, या बदल्यांच्या पार्श्‍वभूमीवर आता मोहल्ला कमिट्यांचीही फेररचना होणार आहे. दारूच्या पेटीची किंमत रक्कम आणि कमिशन वाढविण्यात आले. येणाऱ्या काही दिवसात अवैध दारूतस्कारांच्या मुसक्‍या आवळण्याचे सोपस्कार पार पाडले जाईल. त्यानंतर सर्व सुरळीत होईल, अशी शक्‍यताही पोलिस दलातील असंतुष्ट आत्म्यांनी वर्तविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT