Elderly widow needs help from government 
विदर्भ

VIDEO: वृद्ध विधवेचा सरकारला प्रश्न ‘सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणा नाही, सोंगायचे की नाही तुम्हीच सांगा’

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : निसर्ग कोपला आणि धो-धो बरसला. शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी करून गेला. यावर्षी निसर्गाने तुटपुंजा आलेला घास शेतकऱ्यांच्या तोंडून हिसकावून घेतला आहे. त्यामुळे तिवसा येथील वृद्ध विधवा महिलेने सरकारकडे मदतीची मागणी करीत ‘सोयाबीनच्या शेंगामध्ये दाणा नाही हो साहेब, सोंगायचे की नाही’ अशी दरकार लावली आहे.

यावर्षी पावसाचा ऋतूकाळ संपूनही मेघगर्जनेसह वादळी वारा पाऊस बरसला. या वादळी पावसामुळे बागाईदारपासून तर कोरडवाहू शेतीमध्ये पीक घेणारे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. जिल्ह्यात संत्रा, कपाशी, सोयाबीन या पिकाचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी होत आहे.

तिवसा येथील नर्मदा सरदार या वृद्ध विधवा महिलेकडे शासनाची भोगवटदार २ची अडीच एकर शेत आहे. दरवर्षीप्रमाणे ते शेतात स्वतः पेरणी करून उत्पन्न घेतात. या अडीच एकरात त्यांना नफा-तोटा प्रमाणे दरवर्षी उत्पन्न होते. मात्र, यावर्षी त्यांना याच अडीच एकराच्या शेतीमध्ये मोठे नुकसान सोसावे लागत आहे. पावसाच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी सोयाबीन व तुरीची पेरणी केली. मात्र, सोयाबीन उगवलेच नसल्याने त्यांना पुन्हा पेरणी करावी लागली.

दुसऱ्यांदा सोयाबीन पेरणी करून नुकसान भरून निघेल या आशेत नर्मदा सरदार यांनी पेरणी केली. मात्र, या सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणेच नसल्याने त्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली. त्यामुळे आता शेतात असलेले सोयाबीन पीक सोंगायचे की नाही हा प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. सोयाबीन सोंगुनही जर हाती दाणा लागला नाही तर मजूर व सोयाबीन काढणाऱ्यांचे पैसे द्याचे कुठून. त्यामुळे आता प्रशासनानेच सांगावे की हे सोयाबीन सोंगायचे की नाही, अशी हाक नर्मदा सरदार या प्रशासनाला देत आहे.

तालुक्यात सर्वचे पिकाचे मोठे नुकसान

महिनाभराआधी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आला होता. यामध्ये संत्रा, कपाशी या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याच पावसामुळे हाती आलेले सोयाबीन काळे पडले. एका आठवड्या आधीच्या पावसामुळे कपाशीचे कापूस असलेले बोंड खराब झाले. त्यामुळे तालुक्यात संत्रा, कपाशी, सोयाबीन या पिकांचे आतोनात नुकसान झाल्याचे दिसून येते.

पाहणीसाठी आले आणि गेले

नर्मदाबाई सरदार यांचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लागतच शेत आहे. पीक उगवले नसल्याने त्यांच्या शेतात जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी पाहणी दौरा केला व मदत करू असे आश्वासन दिले. पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी आले पंचनामा केला व निघून गेले. मात्र, मदत अजूनपर्यंत आली नाही. त्यामुळे थेट पंचनामा व मदत अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: महापालिका निवडणुकीत Gen Z ची एन्ट्री! नव्या विचारांची लाट येणार; मतदारांचा कल बदलणार का?

अजय अतुल यांच्या वडिलांचं नुकतंच निधन झालेलं आणि... असं तयार झालं 'तुझ्या पिरतीचा विंचू मला चावला' गाणं

Scorpio Horoscope 2026 : वृश्चिक राशीसाठी हे वर्ष कसं असेल, आव्हान पेलण्याची ताकद निर्माण करा...

Indian Army SSC Tech 2026 : भारतीय सेनेत अधिकारी बनण्याची सुवर्णसंधी! कोणतीच परीक्षा नाही, कशी होणार निवड? पाहा संपूर्ण प्रक्रिया

Latest Maharashtra News Updates Live: जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत रोड शोचे आयोजन

SCROLL FOR NEXT