farmer turned tractor over cotton crop in five acre in gadchandur of chandrapur 
विदर्भ

बोंडअळीमुळे शेतकरी त्रस्त, पाच एकरातील कापसावर फिरविला ट्रॅक्टर

दिपक खेकारे

गडचांदूर (जि. चंद्रपूर): राज्यात अनेक ठिकाणी गुलाबी बोंडअळीच्या थैमानाने हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. कोरपना  तालुक्यात अमलनाला धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाच एकर शेतीत शेतकऱ्याने उभ्या पिकावर ट्रॅक्टर चालविले आहे.

बोंडअळीने गडचांदूरसह अनेक गावातील हजारो शेतकऱ्यांची धुळीस मिळाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना 25 ते 30 हजार रुपये प्रति एकरी खर्च आलेला आहे. परंतु, पीक जोमात असताना आणि कापूस वेचणीला आला असताना गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे एकरी १ लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.

सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करूनही उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. गेल्यावर्षी मर रोगाचा कापसावर प्रादुर्भाव होता. परंतु, त्यावर शासनाकडून पाहणी करण्यात आली. यंदा बोंडअळीमुळे उभ्या पिकावर नागर फिरवायची वेळ शेतकऱ्यांवर आणली आहे. त्यामुळे प्रशासनाने पाहणीसोबतच अंमलबजावणी व आर्थिक मदत देण्याची सुद्धा गरज आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून कापसाचे पीक जोमात येत नाही. जेमतेम उत्पादन झाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे. कोणत्याही फवारणीने बोंडअळी नियंत्रणात येत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. आता बोंडअळीमुळे उभ्या पिकांवर ट्रक्टर फिरविण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली असून गडचांदूर येथील शेतकरी सुभाष एकरे यांनी चक्क पाच एकरावरील कापसावर ट्रॅक्टर फिरविला आहे. 

यंदा चांगले पीक येऊन शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल, अशी आशा होती. परंतु, बोंडअळीने कापूस हातचा गेला. त्यामुळे आमचे सर्व स्वप्न धुळीस मिळाले आहेत. 
-सुभाष एकरे शेतकरी, गडचांदूर

शासनाने संपूर्ण जिल्ह्यातील कापसाचे सर्व्हे करून बोंडअळीसाठी तत्काळ मदत जाहीर करायला हवी.
-मनोज भोजेकर, शेतकरी, गडचांदूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Deputy Chief Minister Ajit Pawar: राहुल गांधींच्या आरोपात तथ्य नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार; 'हरल्यावरच ईव्हीएमची आठवण येते, जिंकल्यावर नाही'

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये डेंग्यूचा कहर, ४०० पेक्षा जास्त रुग्णांची नोंद

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Asia Cup 2025 : अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू असतानाच वडिलांचं निधन, श्रीलंकेच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT