girls discovered within forty eight hours in Chandrapur 
विदर्भ

आई महिनाभरापासून बेपत्ता असताना बहिणींचे झाले अपहरण; आरोपीचे नाव समोर येताच सर्वांना बसला धक्का

साईनाथ सोनटक्के

चंद्रपूर : शहरातील भिवापूर परिसरातून दोन दिवसांपूर्वी पाच आणि सहा वर्षांच्या सख्या बहिणीचे अपहरण झाले. सकाळी नऊ वाजताच्या सुमाराला घडलेल्या या घटनेने अख्खी पोलिस यंत्रणा हादरली. स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षकांनी सूत्र हाती घेतली आणि ४८ तासांच्या आता अपहरण प्रकरणाचा छडा लावला. मात्र, अपहरणाची घटना जेवढी धक्कादायक तेवढीच या मुलींच्या अपहरणकर्त्यांचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांना धक्का बसला. अपहरणकर्त्याची सुद्धा एका महिन्यापासून पोलिस दस्ताऐवजाता बेपत्ता अशी नोंद होती.

शहर पोलिसांनी या दोन्ही चिमुकल्या बहिणींना वर्धा येथून ताब्यात घेतले. सध्या त्या बाल कल्याण समितीच्या ताब्यात आहे. मात्र, तब्बल दोन दिवस या अपहरणाने पोलिसांची झोप उडविली. या अपहरण नाट्याची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील कौटुंबिक वादातून झाली. वरोरा येथील योगिताचा (नाव बदलले आहे) विवाह वणी येथे झाला. संसाराचा सुरुवातीचा काळ आनंदात गेला. दरम्यान, दाम्पत्याला दोन मुलीही झाल्या. त्यानंतर मात्र त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली.

दोन्ही मुलींना वडिलांकडे सोडून योगिता मोहरी परतली. एका महिन्यापूर्वी अचानक योगिता बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार वरोरा पोलिसात केली आहे. दुसरीकडे दोन्ही मुली वडिलांसह वणी येथून चंद्रपुरातील भिवापूर वॉर्डात राहणाऱ्या नातेवाईकाकडे तीन दिवसांपूर्वी आल्या. अंगणात खेळत असताना सकाळी नऊ वाजताच्या सुमाराला दोन्ही मुली दिसेनासे झाल्या. बराच वेळ शोध घेतल्यानंतर दुपारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पाच आणि सहा वर्षांच्या मुलींच्या अपहरणाचे प्रकरण असल्याने पोलिस यंत्रणाही सतर्क झाली. स्वत: जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सूत्र हातात घेतली आणि शहर पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले. जिल्ह्यात सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली. पोलिस ठाण्यांना अपहरणाची सूचना देण्यात आली. मात्र, पहिल्या दिवशी पोलिसांच्या हाती काहीच धोगेदोर लागले नाही. शेवटी मुली बेपत्ता झाल्या त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले.

एक तीस-बत्तीस वर्षांची महिला दोन्ही मुलींना घेऊन जाताना दिसली. पोलिसांनी बेपत्ता मुलीचे वडील आणि नातेवाईकांना हे फुटेज दाखविले आणि साऱ्यांनाच धक्का बसला. या मुलींना घेऊन जाणारी त्यांची आई योगिताच होती. अपहरण कर्त्यांचा शोध लागला. मात्र, पोलिस दप्तरी मागील एका महिन्यापासून योगिता बेपत्ता असल्याची नोंद होती. त्यामुळे तिचा ठावठिकाणा शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले. शेवटी पोलिसांनी नातेवाईकांची झाडाझडती घेतली. तेव्हा एका नातेवाईकाच्या संपर्कात योगिता असल्याचे समोर आले.

खोली भाड्याने घेऊन ती राहायची

पोलिसांना तिचा भ्रमणध्वनी क्रमांक नातेवाईकांकडून भेटला. पोलिसांनी सीडीआर तपासला आणि योगिताचे ‘लोकशेन’ मिळाले. ती एका महिन्यापासून वर्धा येथे खोली भाड्याने घेऊन ती राहत होती. पोलिस उपनीरीक्षक शैलेश जगताप यांच्या नेतृत्वातील पथकाने योगिता आणि दोन्ही मुलींना ताब्यात घेतले. मुलींना बाल कल्याण समितीकडे सोपविण्यात आले. याप्रकरणात पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

आई-वडिलांचा जीव भांड्यात

दोन्ही मुली वडिलांसह चंद्रपुरात येत असल्याची माहिती योगिताला नातेवाईकाने दिली होती. दोन्ही मुली मिळाल्याने वडिलांचा आणि योगिता सापडल्याने तिच्या आई-वडिलांचा जीव भांड्यात पडला. अठ्ठेचाळीस तासापासून राबविलेल्या शोध मोहीमेला यश आल्याने पोलिसांनीही सुटकेचा नि:श्‍वास सोडला आणि अपहरणनाट्याचा शेवट झाला.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautami Patil Latest Update : अखेर गौतमी पाटीलने ‘त्या’ रिक्षाचालकाच्या कुटुंबीयांची घेतली भेट अन् अपघात प्रकरणावर पडला पडदा!

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणून सोलापूरच्या भोंदूबाबाने ‘इतक्या’ लोकांना १५ कोटींना गंडविले; एकजण वकील म्हणून कायदेशीर बाजू सांभाळायचा तर...

Punjab DIG Harcharan Singh Bhullar : कोट्यवधींची रोकड, दीड किलो सोने, आलिशान गाड्या, दागिने, फ्लॅट्स अन् मोजणी अजून सुरूच!

सोलापूर जिल्ह्याचा ८६७ कोटींचा प्रस्ताव! अतिवृष्टी, महापुराचा ७,६४,१७३ शेतकऱ्यांना फटका; कोणत्या तालुक्यातील किती शेतकऱ्यांचा समावेश?, वाचा...

भारतीय कोचचा संघाने पटकावलं T20 World Cup 2026 स्पर्धेचं शेवटचं तिकीट! सर्व २० संघही ठरले

SCROLL FOR NEXT