नागपूर

हातास काम मिळताना, ह्रदयी वसंत फुलला...

गोकुलदास वैरागडे

नांद (जि.नागपूर):  तेंदूपत्ता हंगाम हा मे महिन्यात सुरू होतो. हजारो कामगारांना रोजगार देणारा हा व्यवसाय यंदा लॉकडाउनमुळे अडचणीत आला होता. प्रदीर्घ कालावधीनंतर परिस्थितीत थोडा का होईना बदल झाला. कंत्राटदारांना संकलनाची परवानगी मिळाल्यामुळे पुन्हा संकलनाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे कामगारांना हायसे वाटत आहे.

केव्हा होतो सुरू हा व्यवसाय?
वसंत ऋतू आणि उन्हाळ्याची चाहूल लागताच तेंदूपत्ता कामगार तेंदूपत्ता संकलन करण्याच्या तयारीला लागतात. होळी संपल्यानंतर शेतातील कामे लवकरात लवकर आटोपून पुडके बांधण्यासाठी पळसाची मुळे गोळा करायला लागतात. शेतकरी असो की शेतमजूर दरवर्षी तेंदूपत्ता संकलनातून तीस ते चाळीस हजार रुपये पंधरा ते वीस दिवसांत कमवितात. त्या पैशातून शेतीला लागणारे बी-बियाणे खतासाठी वापर करतात आणि काही उरलेला पैसा उदरनिर्वाहासाठी खर्च करीत असतात. म्हणून दरवर्षी तेंदूपत्ता संकलन या परिसरात मोठ्या प्रमाणात होत असते.

हेही नक्‍की वाचा : रक्‍ताने माखलेल्या मृतदेहाने पारडीत खळबळ

यंदा आलेल्या अडचणी?
यावर्षी लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्याने तेंदूपत्ता संकलन करण्याचे कंत्राट होईल किंवा नाही याची चिंता कामगारांना लागली होती. अशात उशीर का होईना तेंदूपत्ता संकलन करण्यास कंत्राटदारांना मंजुरी दिल्याने या परिसरात तेंदूपत्ता संकलन मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. त्यामुळे मजुरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.

हेही वाचा: युवकांना ठेंगा, पेंशनधारकांनाच पुन्हा नोकरीत संधी

समस्येवर केलेले उपाय?
प्रत्येक मजुरांमध्ये फिजिकल डिस्टन्स ठेवून तेंदूपत्ता संकलनाचे कार्य सुरू आहे.
या परिसरातून तेंदूपत्ता संकलनाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. तेंदूपत्ता संकलनाच्या हंगाम पंधरा ते वीस दिवसांचा असून या हंगामासाठी या परिसरातील अनेक गावांतील मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे. पोटाची खळगी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पहाटेचे पाच वाजतापासून तर दुपारपर्यंत उन्हातान्हात मजूर एकेक पान गोळा करीत असतात. एका रानातून दुसऱ्या रानात धाव घेत हे कार्य अविरत सुरू असते. शेवटी गाठोडे भरले की ते डोक्‍यावर ओझं डोक्‍यावर घेऊन पाच ते सहा किलोमीटर उन्हात पायी चालत घरी येतात. पोटाची खळगी भरण्यासाठी रानावनात कुणाची भीती न बाळगता तेंदूपत्ता संकलन करण्यास मग्न असतात. त्यांना जिवाची पर्वा न करता वन्यपशूंच्या हल्ल्याला तोंडसुद्धा द्यावे लागते. कारण मजुरांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी गावातील झुंबडचे झुंबड जंगलात रवाना होतात. संकलन करण्यासाठी कुटुंबातील लहान मुलांपासून तर ज्येष्ठ व्यक्तीसुद्धा गुंतलेले असतात.

हंगाम कामगारांसाठी महत्वाचा
तेंदूपत्ता संकलनामुळे कामगारांचा वर्षाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो. म्हणून तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम कामगारांच्यादृष्टीने महत्त्वाचा वाटतो.
एकनाथ गजभिये
ग्रामस्थ, नांद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT