colleges take more fees for m com and msc admission in nagpur university 
नागपूर

'एम. कॉम'सह 'एस. एस्सी'च्या प्रवेशात महाविद्यालयांची चांदी, विद्यार्थ्यांची आर्थिक लूट

मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पदव्युत्तर प्रवेश सुरू असून वाणिज्य आणि विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तिसरी फेरी सुरू आहे. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर प्रवेश देण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची आर्थिक लुट होत असल्याच्या तक्रारी येत आहे. विशेष म्हणजे रिक्त जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून एक लाख तर ५० हजारांपर्यंतची वसुली केली जात आहे. 

नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी संलग्नित महाविद्यालयांचा मनमानी कारभार थांबावा या उद्देशाने सुरुवातीला विद्यापीठातील शैक्षणिक विभाग आणि नंतर संलग्नित महाविद्यालयांसाठी केंद्रीय प्रवेश पद्धती सुरू केली होती. मात्र, यंदा एम.एसस्सी. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी महाविद्यालयांनी सुरू केलेला घोडेबाजार बघता या उद्देशाला हरताळ फासल्याचे चित्र आहे. विद्यापीठाने ऑनलाइन प्रवेशाच्या केवळ दोनच फेऱ्या घेत सोमवारी सायंकाळी चार वाजता महाविद्यालयांमध्ये रिक्त असणाऱ्या जागांची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर झाल्यावर इच्छुक विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. मात्र, यादी जाहीर होताच नामवंत महाविद्यालयांमधील एम.एसस्सी.चे प्रवेश पूर्ण झाले होते. या जागा भरताना एक लाख ते पन्नास हजारांपर्यंतची अतिरिक्त पैसे विद्यार्थ्यांकडून घेतले जात आहे. गोरगरीब आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या विदर्भातील नामवंत शिक्षण संस्थेमध्येही सर्रास हा प्रकार सुरू असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळे रिक्त जागांची यादी बघून विद्यार्थी प्रवेशासाठी गेल्यास त्यांना एकही जागा शिल्लक नसल्याचे सांगून परत पाठवले जात आहे. 

प्रवेश समितीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह - 
गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांचा सामान्य विज्ञानमध्ये प्रवेशाचा ओढा वाढला आहे. एम.एसस्सी.मध्ये गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयांना विद्यार्थ्यांची अधिक मागणी असते. त्यामुळे बहुतांश महाविद्यालयांमध्ये या विषयातील प्रवेशासाठी चढाओढ असते. याची जाणीव असतानाही केंद्रीय प्रवेश समितीने प्रवेशाच्या केवळ दोनच्या फेऱ्या का घेतल्या? असा सवाल उपस्थित केला जात आहे. रिक्त जागा आणि प्रवेश घेणारे विद्यार्थी असताना तिसरी फेरी घेतल्यास अनेकांना ऑनलाइन माध्यमातून प्रवेश मिळाला असता. शिवाय महाविद्यालयांकडून होणारी लूट रोखता आली असती. त्यामुळे विद्यार्थी संघटनांकडून प्रवेश समितीच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुणे महापालिकेच्या तिजोरीत ५ हजार ३२६ कोटी; मिळकतकरातून २,९८५ कोटी, तर बांधकाम करातून २,३४१ कोटी

सायली-प्रियामध्ये जोरदार जुंपली; एकमेकांच्या झिंज्या उपटणार सुभेदारांच्या सुना, कारण ऐकून अर्जुनही हैराण, प्रेक्षक म्हणतात-

Patur Hailstorm : पातूर तालुक्यात गारपीट; नुकसानीचे पंचनामे करा - आमदार नितीन देशमुख यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

अशोक खरातच्या मुलाला SITने घेतलं ताब्यात, पत्नी फरार; गेट बंद असल्यानं कंपाऊंडवरून पथक घुसले घरात

Malegaon News : विलंबाचा फटका प्रशासनाला; बारामतीत शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

SCROLL FOR NEXT