नागपूर

दुर्दैवी! आईनं मोबाईल हिसकावला म्हणून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

अनिल कांबळे

नागपूर ः जेवन करताना मोबाईल न वापरण्याची तंबी दिल्यामुळे चिडलेल्या १५ वर्षीय मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मानकापुरातील गोधनी परीसरात घडली. संस्कृता चंद्रशेखर सिंग असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रशेखर सिंग हे रेल्वे विभागात अधिकारी पदावर कार्यरत आहेत. त्यांना एक मुलगा आणि संस्कृता अशी दोन अपत्य आहेत. संस्कृता ही नववीत असल्यामुळे तिच्या वडिलांनी ऑनलाईन क्लासेससाठी मोबाईल घेऊन दिला. गेल्या वर्षभरापासून ती ऑनलाईन क्लासेस करीत होती. परंतु गतमहिन्यात नववीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना सरसरक पास करण्यात आल्याचा शिक्षण विभागाने निर्णय घेतला. तेव्हापासून तिला मोबाईल वापरण्यावर निर्बंध घालण्यात येत होते. परंतु तिला तोपर्यंत मोबाईलचे वेड लागले होते.

चार तास ऑनलाईन क्लासेस झाल्यानंतर संस्कृताला व्हॉट्‍सॲप, फेसबूक, ट्‍वीटर, इंस्टाग्राम आणि सोशल मिडियावर वावरण्याची सवय लागली. त्यामुळे ती नेहमी मोबाईल घेऊनच राहत होती. तिचा बराच वेळ मोबाईलवर जात होता. त्यामुळे आईने तिला दोन ते तिनदा हटकले. त्यावर ती आईवरच चिडचिड करायची. २४ एप्रिलच्या दुपारी तीन वाजता ती मोबाईलवर खेळत होती. दरम्यान तिच्या आईने तिचा मोबाईल हिसकला आणि जेवन करण्यास सांगितले. त्यामुळे संस्कृता चिडली. आई वारंवार मोबाईलमुळे रागावत असल्याचा राग तिच्या मनात होता. त्यामुळे ती वरच्या माळ्यावर गेली आणि ओढनीने सिलिंग फॅनला गळफास घेतला.

दरम्यान तिच्या आईला मुलीच्या वागण्यावर संशय आला. ती काही वेळातच तिच्या मागे गेली. बेडरूममध्ये जाताच संस्कृता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्याने आईने मोठ्‍याने हंबरडा फोडला. घरातील सर्वांनी बेडरूमकडे धाव घेतली. बेशुद्धावस्थेत संस्कृताला रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान संस्कृताचा २९ एप्रिलला सकाळी साडेसात वाजता मृत्यू झाला. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

लॉकडाउनमुळे मुलांना घराबाहेर पडता येत नसल्यामुळे मोबाईलच आता एकमेव जीवाभावाचा सोबती आहे. त्यामुळे ते मोबाईलवर वेळ घालवितात. मुलांना नाही ऐकण्याची सवय पालकांनी लावली नाही. त्यामुळे मुले जिद्दी बनतात. मुलांची कोणतीही मागणी पालक लगेच पूर्ण करतात, त्यांचे लाड आणि हट्ट पुरविल्या जातात. त्यामुळे त्यांच्यात सहनशिलता राहत नाही. मुलांमधील संयम हरवत चालला आहे. पालक मुलांसमोर झुकत आहेत. त्यांच्या विरोधात वागल्यास त्यांना राग येतो, त्या रागाची तिव्रता खूप असते. त्यामुळे ते कोणतेही पाऊल उचलू शकतात.
प्रा. राजा आकाश (मानसोपचार तज्ञ)

संपादन - अथर्व महांकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT