नागपूर

सरकारचा ग्राम पंचायतींवर मर्जीतील व्यक्तीच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा

नीलेश डोये

नागपूर : कोरोनामुळे राज्यातील हजारो ग्राम पंचायतींच्या निवडणुका झाल्या नाहीत. यामुळे ग्राम पंचायतींचा कारभार वाऱ्यावर पडला. अजून चार-सहा महिने निवडणूक होणार नसल्याचे चित्र आहे. ग्राम पंचायतींचा कारभार नियमित चालविण्याकरता प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भात कायद्यात तरतूद केली असून त्या संदर्भातला अध्यादेशही सरकारने काढला.

यात प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची निवड करण्याचा अधिकार सरकारकडे असून योग्य व्यक्ती कसा ठरविणार असा प्रश्‍न उपस्थित होत असला तरी यामुळे सरकारला मर्जीतील व्यक्तीचा ग्राम पंचायतींवर प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसते.

कोरोनाच्या नियंत्रणाकरता करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेक निवडणुका लांबणीवर पडल्या. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निवडीचा पेच सुद्धा निर्माण झाला होता. केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर विधान परिषदांच्या निवडणुका झाल्या आणि उद्धव ठाकरे विधिमंडळाचे सदस्य झाले. कोरोनामुळे ग्राम पंचायतींच्या निवडणुकाही घेता आल्या नाही.

राज्यात जवळपास पुढील सहा महिन्यात 12 हजारावर ग्राम पंचायतीचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. तर जवळपास पाच हजारांवर ग्राम पंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. ग्राम पंचायत कायद्यात प्रशासक नियुक्त करण्याची तरतूद नाही. त्यामुळे या ग्राम पंचायतींबाबत मोठा पेच निर्माण झाला असून कारभार वाऱ्यावर आहे. शाळा सुरू होणार आहे.

शाळा, गाव कोरोनामुक्त ठेवण्याकरता आवश्‍यक उपाययोजना करण्याची जबाबदारी सरपंचांवर टाकण्यात येणार आहे. परंतु सरपंच नसल्याने मोठी अडचण होण्याची शक्‍यता आहे. कार्यकाळ संपल्याने व निवडणुका होणार नसल्याने ग्राम पंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यासंदर्भातली तरतूद ग्राम पंचायत कायद्यात केली असून अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी 25 जूनला तसा अध्यादेशही काढला. यानुसार प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची निवड करण्यात येणार असून याचे अधिकार राज्य सरकारकडे असणार आहे. 

योग्य व्यक्ती कोण?

योग्य व्यक्ती कोण असेल, या संदर्भातील कुठलेही स्पष्टीकरण कायद्यात नाही. योग्य व्यक्ती ग्राम पंचायती अंतर्गतला असेल किंवा बाहेरील, अधिकारी किंवा सदस्य राहिल, याबबतचेही स्पष्टीकरण नाही. भविष्यात यामुळे पेच निर्माण होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT