Congress Congress
नागपूर

आघाडीत काँग्रेसचेच नुकसान? निकालानंतर एकत्र येण्याचा दिला फॉर्म्युला

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी ५० जागा सोडल्यास त्यांच्या भागात पंजा दिसणार नाही

राजेश चरपे

नागपूर : राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत महापालिकेच्या निवडणुकीत महाआघाडी (Mahavikas aaghadi) केल्यास भविष्यात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत मोठा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढायची आणि निकालानंतर एकत्र यायचे असा फॉर्म्युला काँग्रेसमार्फत समोर करण्यात आला आहे.

शहरात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (congress) फारसे अस्तित्व नाही. शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच नगरसेवक आहे. निवडून आलेले नगरसेवक स्वतःच्या ताकदीवर आले आहेत. त्यात त्यांच्या पक्षाचे फारसे योगदान नाही. मध्य आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे कार्यकर्ते दिसतात. उर्वरित चार मतदारसंघात तोंडी लावायलासुद्धा दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. शिवसेनेचे निवडून आलेले दोन नगरसेवक एकाच प्रभागातील आणि दक्षिण नागपूरमधील आहेत.

राष्ट्रवादीला पंधरा वर्षात स्वतःचे अस्तित्व निर्माण करता आले नाही. आजवर काँग्रेसच्या (congress) बळावर आठ-दहा नगरसेवक निवडून येत होते. स्वतंत्रपणे लढल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची संख्या एकवर येऊन ठेपली आहे. महविकास आघाडी झाल्यास दोन्ही पक्षांना प्रत्येकी २५ यानुसार ५० जागा सोडाव्या लागणार आहे. त्यानंतर प्रभागामध्ये एक मत काँग्रेसला, दुसरे मते राष्ट्रवादीला (National congress party) आणि तिसरे मत शिवसेनेसाठी मागावे लागेल. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची जास्त शक्यता आहे. यात अनेक मते अवैध ठरण्याचाही धोका आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी (National congress party) ५० जागा सोडल्यास त्यांच्या भागात पंजा दिसणार नाही. त्यामुळे काँग्रेसचे मतपेढी आणि टक्केवारीसुद्धा सहाजिकच कमी होणार आहे. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक लढताना काँग्रेसच्या उमेदवारांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षाने स्वबळावर निवडणूक लढाव्या, त्यानंतर एकत्र यावे असा युक्तिवाद काँग्रेसचा (congress) आहे.

महाविकास आघाडीबाबत (Mahavikas aaghadi) कुठलीही चर्चा झाली नाही. अद्याप प्रभागाच्या आरक्षण सोडत निघायची आहे. सोडतीनंतर २० प्रभागांमध्ये दोन जागा महिला तर २६ प्रभागांमध्ये दोन जागा पुरुष उमेदवारांसाठी सोडाव्या लागणार आहेत. आधी आम्हांला काँग्रेसचे उमेदवार सामावून घ्यावे लागतील. सध्यातरी आघाडी होण्याची कुठलीही शक्यता दिसत नाही.
- विकास ठाकरे, शहर काँग्रेसचे अध्यक्ष
आम्ही जोमाने कामाला लागलो आहोत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते राष्ट्रवादीकडे आहे. आघाडी झाली तर योग्य, नाही झाली तरी आमच्याकडे गमावण्यासारखे काही नाही. वेगवेगळे लढल्यास मतविभाजन होते हे कुणाला सांगण्याची गरज नाही. याचा सर्वाधिक फटका काँग्रेसलाच बसू शकतो.
- दुनेश्वर पेठे, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 : भारताचा आज ओमानविरुद्ध अखेरचा साखळी सामना; संजू सॅमसन, जसप्रीत बुमराहला विश्रांती? कशी असेल प्लेईंग XI?

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्याला इडली-पोह्याचा कंटाळा आलाय? मग बनवा झटपट सुरतचा फेमस लोचो, लगेच नोट करा रेसिपी

Panchang 19 September 2025: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

आजचे राशिभविष्य - 19 सप्टेंबर 2025

SCROLL FOR NEXT