nagpur death Sakal
नागपूर

Nagpur : ६५ वर्षीय कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्त्या

बॅंकेचे कर्ज कसे फेडायचे याची चिंता त्यांना वाटत होती. पीकपाणी बरे झाले असते तर कर्जाचे हप्ते भरता आले असते.

सकाळ वृत्तसेवा

उमरेड - कर्जबाजारीपणामुळे बेसूर या गावातील ६५ वर्षीय शेतकरी रामकृष्ण तुळशीराम गिरडे यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली.

शेतीचा धंदा तोट्याचा होत असल्याने आणि निसर्गही साथ देत नसल्याने नैराश्य आलेले शेतकरी आत्महत्त्येचा मार्ग पत्करत आहेत. शेतीसाठी कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. रामकृष्ण यांनी बेसूर येथील आयडीबीआय बॅंकेतून शेतीवर २ लाख १५ हजारांचे कर्ज घेतले. मात्र, त्यानंतर सततची नापिकी मागे लागल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेला.

त्यातच शरीर साथ देत नसल्याने त्यांची स्थिती अधिकच बिकट झाली होती. बॅंकेचे कर्ज कसे फेडायचे याची चिंता त्यांना वाटत होती. पीकपाणी बरे झाले असते तर कर्जाचे हप्ते भरता आले असते. पण दिवसेंदिवस व्याज वाढत चालल्याने त्यांच्या जिवाला घोर लागला होता. सोबतच कर्ज फेडण्यासाठी बॅंकेचा तगादा सुरू असल्याने दडपणाखाली येऊन त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.

रामकृष्ण तुळशीराम गिरडे यांनी आत्महत्या केली, अशी फिर्यादी नीलेश हिरालाल गिरडे(वय३८) रा-बेसूर यांनी दिली. तोंडी रिपोर्टवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद घोंगे यांच्या मार्गदर्शनात दिनेश गाडगे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT