Entrepreneur dream  sakal
नागपूर

नागपूर : उद्योजकांच्या स्वप्नाला सुरुंग

बुटीबोरी, हिंगण्यातील उद्योगांचे ४० टक्के उत्पादन ठप्प

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मंदीत होरपळलेल्या उद्योगांना करात सवलत नाही, पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर, विजेचे दर कोणत्याही उद्योगाला न परवडणारे असताना वसुली मात्र सक्तीची होताना दिसून येते. त्यामुळे अनेक नवोदित उद्योजकांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यासारखे वाटत आहे. लॉकडाउननंतर आता पुन्हा व्यवसाय सुरू झाले. मात्र, कच्चा मालाचे वाढलेले भाव आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून उशिरा मिळणारे बिल. यामुळे नागपूर जिल्ह्यातील उद्योगांचे ४० टक्के उत्पादन ठप्प झालेले आहे.

कच्चा माल आणि सिमेंट, स्टील, इंधनाच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांवर परिणाम झाला. राज्यात दोन वर्षांपेक्षा आता परिस्थिती बदलली आहे. हे क्षेत्र आता कोसळण्याच्या मार्गावर आहे. या क्षेत्राची स्थिती अत्यंत नाजूक असून या क्षेत्राला सावरण्याचा प्रयत्न राज्य आणि केंद्र सरकारकडून करणे अपेक्षित आहे. इंधनाचे दर वाढल्याने परिवहन खर्चही वाढलेला आहे. दुसऱ्या लाटेनंतर उद्योगाला चांगले दिवस येऊ लागले होते. मात्र, इंधनाच्या दरासह कच्च्या मालाचे दर वाढल्याने पूर्वी घेतलेल्या मालाच्या ऑर्डरची पुर्तता उद्योजकांनी केली. आता वाढलेल्या दरात नवीन ऑर्डर मिळणे कठीण झालेले आहे.

त्यामुळे उद्योजकांनी उत्पादन कमी केलेले आहे. परिणामी, ४० टक्के उत्पादन ठप्प झालेले आहे. तसेच पुरवठा केलेल्या मालाची बिलेही राष्ट्रीयकृत संस्था, शासकीय संस्थाकडून वेळेत मिळत नाहीत. त्याची वाच्यता करायची कुठे असाही सवाल उद्योजकांसमोर उभा ठाकला आहे. आता सप्लाय चेन खंडित झाल्या आहेत. उद्योजकांकडे असलेल्या ठेवी आता संपत आल्या आहेत. बँकांची वसुली थांबत नाही, व्याज थांबत नाही, पगार थांबत नाही, वाहतूक खर्च वाढला आहे, अशा परिस्थितीत राज्य सरकारने मोठ्या सोडा, पण छोट्या व्यावसायिकांनासुद्धा कवडीचीही मदत केली नाही. स्वबळावर उभारी घेतली असताना आता उद्योगांना उतरती कळा लागली आहे.

''कच्चा मालाच्या वाढलेल्या दरात उद्योजकांना नवीन ऑर्डर मिळणे कठीण झाल्याने उद्योजकांनी उत्पादन कमी केलेले आहे. परिणामी, ४० टक्के उत्पादन ठप्प झाले आहे. तसेच पुरवठा केलेल्या मालाची देयकेही राष्ट्रीयकृत संस्था, शासकीय संस्थाकडून वेळेत मिळत नाहीत. त्याची वाच्यता करायची कुठे असाही सवाल उद्योजकांसमोर आहे.''

- चंद्रशेखर शेगावकर, अध्यक्ष, एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशन

''कच्चा मालाचे दर वाढल्याने उद्योगांना काही सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या जुन्याच दरात काम करण्याची सक्ती करीत आहे. ते परवडणारे नसल्याने नवीन ऑर्डर मिळणे कठीण झालेले आहे. परिणामी उद्योग अडचणीत सापडलेले आहेत.''

- नितीन लोणकर, माजी अध्यक्ष बुटीबोरी इंडस्ट्रीज असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT