Nagpur summer news The heat wave is increasing day by day 
नागपूर

उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढतोय; मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पारा चाळीशीपार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विदर्भात उन्हाचा तडाखा दिवसागणिक वाढत आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पारा चाळीशीपार गेला आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याचे संकेत दिल्याने उष्माघातासारखे आजार डोके वर काढण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.

कमाल तापमानाने गेल्या चोवीस तासांत अचानक उसळी घेत या मोसमात प्रथमच चाळीशी गाठली. विदर्भात ब्रम्हपुरी येथे सर्वाधिक ४०.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल तापमानाची नोंद अकोला (४०.१ अंश सेल्सिअस) व चंद्रपूर (४०.० अंश सेल्सिअस) येथे झाली. नागपूरसह विदर्भातील अन्य जिल्ह्यांमध्येही पारा झपाट्याने वाढत आहे. अनुकूल वातावरण लक्षात घेता, या आठवड्यात कमाल तापमानात आणखी वाढ अपेक्षित आहे. त्याचवेळी आठवड्याअखेरीस ढगाळ वातावरण व पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.

उन्हाळा सुरू झाल्याने आजारही वाढू लागले आहेत. या दिवसांमध्ये उष्माघातासारखे जीवघेणे आजार डोके वर काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची अधिक गरज आहे. उष्णतेमुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होते. ही शक्यता लक्षात घेता खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळ- संध्याकाळ नियमित व्यायाम व प्राणायामासोबतच पुरेशी झोप व हलका आहार घेण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.

हे करा

उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सदैव कॅप, गॉगल, दुपट्टा, छत्रीचा वापरा करा. उन्हातून आल्यावर सहसा नैसर्गिक थंड पेय किंवा गूळ पाणी प्यावे. शक्यतो माठातील थंड पाणीच प्यावे. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यावे. तसेच जिरेपूड असलेले ताक, मठ्ठा, लिंबू, आवळा, सरबताचे नियमित सेवन करावे. याशिवाय खडीसाखर, कलिंगड, सफरचंद, चिकू, लिंबू, काकडी, पालक व कच्चे टोमॅटो, गाजर, कोथिंबीर, पुदिना, बीट, डाळिंब, उसाचा रस (बर्फ न घालता) व नारळाचे (शहाळे) पाणी प्यावे.

हे टाळा

शक्यतो भर उन्हात घराबाहेर पडू नये. उन्हातून घरी आल्यावर सहसा कुलरसमोर बसू नये. बर्फमिश्रित पेय, कोल्ड्रिंक्स, चहाचे सेवन करू नये. फ्रीजमधील थंड पाणी पिऊ नये. तसेच संत्री, आंबा, आले, लसूण, बटाटा, मध, पपई, मध, गूळ, शेंगदाणे, बदाम, काजू, अक्रोड, खजूर या उष्ण पदार्थांचे सेवन टाळावे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT