Untimely rains sakal
नागपूर

नागपूर : सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले

चंद्रशेखर बावनकुळे : एकरी ५० हजार भरपाई द्या

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गेल्या तीन दिवसांपासून पूर्व व पश्चिम विदर्भात (East and West Vidarbha) अवकाळी पाऊस (Untimely rains) व गारपिटीने शेतकर्‍याच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कापूस, हरबरा, तूर, गहू, संत्रा, मोसंबी ही पिके शेतकऱ्यांच्या (farmer) हातातून गेली. पण शासनदरबारी अजून कोणतीच दखल घेतली गेली नाही. विदर्भातील शेतकर्‍याला महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने वाऱ्यावर सोडले, असा आरोप आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

गारपीट होऊन तीन दिवस लोटले आहेत. पण अजून पालकमंत्र्यांनी गारपीटग्रस्त भागाचा दौरा केला नाही. त्यामुळे पंचनामे झाले नाहीत व पंचनामे करण्याचे आदेशही निघाले नाहीत. या सरकारला राजकारण करायला वेळ आहे. पण नुकसानग्रस्त भागाचे दौरे करायला वेळ नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याच्या गप्पा मारणारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विदर्भात गारपीट झाली की नाही याची याचीसुद्धा माहिती नाही. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्याचे झालेले नुकसान पाहणे आणि त्यांच्या पाठीशी उभे राहून त्याला दिलासा देण्याची ही वेळ आहे. नेमक्या याच वेळी शासनाने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले, अशी टीका बावनकुळे यांनी केली.

ओबीसींना सर्वाधिक न्याय

भाजपने देशात ओबीसींना सर्वाधिक न्याय दिला. देशाच्या मंत्रिमंडळात २७ पेक्षा अधिक मंत्री ओबीसी आहेत. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना आरक्षण दिले. नॉन क्रिमीलेअरच्या विद्यार्थ्यांना सवलती दिल्या. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय तयार करण्यात आले. ओबीसींचे आरक्षण नाकारले असा आरोप करून भाजपाला बदनाम करण्याचे काम काही नेते करीत आहेत. त्यांना जनता निश्चितपणे धडा शिकवेल, असेही बावनकुळे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT