नागपूर

नागपूर : विदर्भातील नेत्यांची लाज वाटते!

सोयाबीन-कापसासाठी तुपकरांची ‘करो या मरो’ची लढाई सुरू

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नऊ महिन्यामध्ये पश्‍चिम विदर्भातील ९०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी संघटित नाही. याचा फायदा विदर्भातील नेते घेतात. एकही नेता सोयाबीन, कापसाच्या प्रश्‍नांवर ‘ब्र’ सुद्धा काढत नाही. यांना ‘हिंदू खतरेमे है’, ‘आर्यन खान’ ‘समीर वानखेडे’, ‘कंगना राणावत’ यांचीच पडली आहे. हे चाललय काय? विदर्भातील नेत्यांची आम्हाला लाज वाटते, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली.

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात येथील संविधान चौकात अन्नत्याग आंदोलन सुरू झाले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत अन्नाचा एक कणही खाणार नाही, अशी प्रतिज्ञा करीत आता ही ‘करो या मरो’ची लढाई सुरू झाली असल्याचे तुपकर यांनी सांगितले. तुपकर म्हणाले, सोयाबीनला ८ हजार आणि कापसाला १२ हजार हा भाव बाजारात स्थिर केला पाहिजे. आम्ही हमीभाव नाही मागत, पण बाजारातला सोयाबीनचा भाव ८ हजार रुपयांच्या खाली येऊ देऊ नका आणि कापसाचा १२ हजार रुपयांच्या खाली येऊ देऊ नका, अशी मागणी घेऊन आम्ही देशाचा मध्यभागी असलेल्या ठिकाणी आलो आहोत.

दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने पोल्ट्रीचालकांच्या नावाखाली सोया पेंड आयात केली आणि सोयाबीनचे दर पाडले. पाम तेल आणि खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केले. ते कमी होती की काय म्हणून तेल बिया आणि खाद्यतेलांवर स्टॉक लिमिट घातली. त्यामुळे आमच्या सोयाबीनचा भाव ११ हजार रुपयांवरून ४ हजार रुपयांवर आला. आत्ता या क्षणापासून मागण्या पूर्ण होईपर्यंत अन्नाचा एक कणही ग्रहण करणार नाही, अशी घोषणा रविकांत तुपकर यांनी केली. जोपर्यंत सोयाबीन व कापूस उत्पादकांना मागितलेला भाव द्यावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.

‘त्यांच्या’ ताटातील प्रत्येक कण आमच्या घामाचा आम्ही कुणाच्या परवानगीला मोजणारे लोक नाही. आम्ही या देशाचे अन्नदाते आहोत, पोशिंदे आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, महाराष्ट्रातील राज्यकर्ते, टाटा, बिरला आणि अंबानींच्या ताटातील अन्नाचा कण न कण आमच्या मायबापाच्या घामाच्या थेंबांतून आलेला आहे. पहिले हकदार आम्ही शेतकरी आहोत. कारण अद्याप तरी टाटा, बिरला आणि अंबानींच्या कारखान्यांमध्ये धान्य तयार करण्याचं तंत्रज्ञान विकसित झालेलं नाही. अंबानी, अदानीला स्वस्तात सोयाबीन मिळाले पाहिजे, म्हणून जर केंद्र सरकार अशी धोरणं राबवणार असेल, तर शेतकऱ्याचा पोरगा हे कदापि सहन करणार नाही, असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Sonsने चंद्रशेखरन यांना निवडलं, पण टाटा ट्रस्ट्सचा विरोध! नोएल टाटाच खरे किंगमेकर? टाटामध्ये चेअरमनची निवड कशी होते?

Jos Buttler: जॉस बटलरचा वर्ल्ड रेकॉर्ड! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १५,००० धावा करणारा फलंदाज; विराट कोहली, रोहित शर्मा टॉप ५ मध्येही नाहीत

आम्ही कुठे जायचं? न्यायाधीशाचा प्रश्न; ५ महिन्यात २३ जणांना फाशीची शिक्षा, आता ९७ गंभीर खटले ट्रान्सफर होताच संतापले

गर्दीतून जात होती सलमान खानची कार, ड्रायव्हरच्या चूकीमुळे भाईजान चिडला, चालकाला जोरात मारलं अन्... Viral Video

Insulin Resistance Symptoms: डायबेटीस होण्याआधी शरीर देतं ‘हे’ संकेत; असं ओळखा तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स आहे की नाही!

SCROLL FOR NEXT