Women protest against illegal wine shop  
नागपूर

महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार; दुकान बंद करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयावर काढला मोर्चा

सकाळ डिजिटल टीम

नागपूर  -गट ग्रामपंचायत मांगली हद्दीतील नागपूर-वर्धा जिल्हा सीमेवरील दारूचे दुकान बंद करण्याकरिता स्थानिक महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढुन दारूबंदीचा एल्गार पुकारला आहे.

गट ग्रामपंचायत मांगली येथील ग्रामसेवक , सरपंच व सदस्यांनी कोरोनाच्या आडून ग्रामवासीयांना विश्वासात न घेता 21 जुलै 2020 रोजी परस्पर ठराव घेऊन गट ग्रामपंचायत मांगली हद्दीत दारूचे दुकान सुरू करण्याची परवानगी दिली. या दुकानामुळे येथील नागरिकांना त्रास होतो आहे. 

असामाजिक तत्वांना ऊत येत असून ग्रामवासीयांना अनेक सामाजिक, आरोग्यदायी समस्यांना सामोरे जावे लागत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. 

दारूचे दुकान तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ व महिलांनी केली आहे. ग्रामवासीयांशी विश्वासघात करून दारुच्या दुकानाला परवानगी देणाऱ्या ग्रामपंचायतीमधील  समितीला बरखास्त करावे अशीही मागणी करण्यात आली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: TMC नेता BJP मध्ये सामील व्हायला आला; पण भाजप कार्यकर्ता संतापला, चेहऱ्याला हिरवा रंग फासून बाहेर काढलं

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 2 दिवसांतच भावात मोठा बदल; मुंबई-पुणेसह महाराष्ट्रात आजचा दर किती?

ENG W vs SL W : रेकॉर्ड ब्रेकिंग मॅच! इंग्लंडचा दणदणीत विजय अन् श्रीलंकेविरुद्ध विक्रमांचा पाऊस; टीम इंडियाचाही विक्रम मोडला

Sex Determination Racket: गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश! पुण्यातून सहावे सोनोग्राफी मशीन जप्त; डॉक्टर, एजंट आणि गर्भपात केंद्रे पोलिसांच्या रडारवर

Nashik Rainfall : पावसाचे दिवस 40 ते 45 वर घसरले; बदलत्या पॅटर्नमुळे शेती अस्थिर, पीकवाढीचे चक्रच कोलमडले, 2019-2015 ची आकडेवारी काय सांगते?

SCROLL FOR NEXT