नागपूर

तरुण-तरुणींचे पालकांविनाच शुभमंगल! दररोजचे प्रसंग

केतन पळसकर

नागपूर : ‘दहा सकारात्मक गोष्टींसोबत दोन नकारात्मक गोष्टी देखील आपसूकच येतात’, अशी म्हण आहे. याचाच प्रत्यय विवाह नोंदणी (Marriage registration) दरम्यान येतो. मुलाचे वय २१ आणि मुलीचे वय १८ झाल्यानंतर कायद्यांन्वये लग्न करण्यासाठी ती सुजाण ठरतात. हा नियम समाजातील प्रत्येकाच्या डोक्यात गोंदविला गेला आहे. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने शहरात आलेले जोडपी याचा फायदा घेत विवाह बंधनात अडकतात. अर्थातच पालकांना याची कल्पना न देता. जवळपास दररोज अशा पद्धतीने लग्न होतात. (Young-people-get-married-without-parents)

पहिली घटना

सोशल मिडियाच्या माध्यमातून रिया आणि संकर्षणची (बदललेले नाव) ओळख झाली. एकमेकांवर विश्‍वास संपादन झाल्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. कोवळ्या वयात जडलेले आकर्षण आणि घरचे लग्नाची परवानगी देणार नाही, असा कयास धरत रिया आणि संकर्षण यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आपल्या पालकांना न सांगता विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी केली. मित्र मंडळींना साक्षीदार करीत रीतसर लग्न झाले. मात्र, काही दिवसात नात्यात कटुता आल्यानंतर काडीमोड घेण्यासाठी संकर्षण याने पुन्हा वकिलाला गाठले.

दुसरी घटना

परराज्यात राहणाऱ्या किसन व रीमा (बदललेले नाव) नोकरीच्या निमित्ताने शहरामध्ये आले. एका खासगी कंपनीमध्ये काम करताना एकमेकांची ओळख झाली. एकमेकांमध्ये आकर्षण निर्माण झाल्यानंतर कीसनने रीमाला लीव्हइनमध्ये राहण्याचा प्रस्ताव दिला. रीमाने काही दिवस आढेवेढे घेतल्यानंतर तो मान्य केला. कीसनने घराची शोधाशोध सुरु केली. मात्र, जोडपी पाहून कोणी त्यांना कोणी रूम दिल्या नाहीत. मित्राने नोंदणी पद्धतीने लग्न केल्याचे एक दिवस किसनला कळले आणि लिव्हइनमध्ये राहण्यासाठी हाच उपाय कीसनने शोधला. नोंदणी करीत किसन आणि रीमाने लग्न केले आणि राहण्यासाठी घर मिळविले.

बस्स तुम्ही फक्त पैसे द्या

लग्न करायचे आहे? बस्स.. दोन हार, मंगळसूत्र आणि सात हजार रुपये द्या.. बाकी आम्ही बघतो. पालकांना संभ्रमात ठेवत लग्न करणाऱ्या जोडप्यांसाठी या अन्‌ अशा चार-पाच संस्था शहरामध्ये समाजसेवा (?) करीत लग्न लावून देत आहेत. लग्न लावून दिल्यानंतर महापालिकेमध्ये नोंदणी करण्यासाठी लागणारे फोटो, प्रमाणपत्र आदी बाबी या संस्था पुरवितात. कायद्याने या प्रकारचे लग्न वैध मानल्या जाते. बाहेर गावचे अनेक जोडपी पळून येत शहरामध्ये या पद्धतीने लग्न करतात.

घरमालकाने घर भाड्याने देताना कायदेशीर बाबी पूर्ण करायला हव्या. तर, पालकांनी आपल्या पाल्यांचे लग्न लावून देताना वधु-वराची पूर्ण चौकशी करायला हवी. भूतकाळात अशा घटना घडल्या असल्यास भविष्यामध्ये त्या डोकेदुखी ठरु शकतात.
- ॲड. अनिल कावरे

(Young-people-get-married-without-parents)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला कमिन्सचा जोरदार धक्का! रोहित शर्माला 4 धावांवरच धाडलं माघारी

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT