no development in Aamdeli village in Sironcha district gadchiroli  
विदर्भ

ना पक्का रस्ता ना वीज; 'या' गावात मॉडर्न भारत अजून पोहोचलेलाच नाही..काय आहे कारण? वाचा सविस्तर

तिरुपती चिट्याला

सिरोंचा(जि. गडचिरोली) : आपला भारत देश आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकीय, सामाजिक, आर्थिक अशा प्रत्येक क्षेत्रात आपला देश उत्तरोत्तर प्रगती करतो आहे. अगदी चंद्र आणि मंगळ यांच्या सारख्या लाखो किलोमीटर दूर असणाऱ्या ग्रहांवर आपला देश भरारी घेतोय. मात्र आपल्याच देशात काही गाव असे आहेत ज्यांच्यापर्यंत मॉडर्न भारत अजून पोहाचलेलाच नाही. अशाच एका गावाची ही व्यथा आहे.   

गडचिरोलीच्या सिरोंचा तालुका मुख्यालयापासून जवळच असलेले आमडेली हे गाव. भारटाळा स्वातंत्र्य मिळून  तब्बल सात दशके  उलटूनही  या गावाने अजूनही 'विकास' नावाचा शब्दही ऐकलेला नाही. या गावात अनेक समस्या असून गावकरी अनेक समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत.

गावात साधा पक्का रस्ताही नाही 

आमडेली हे गाव सिरोंचा-आलापल्ली या मुख्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून बारा किमी अंतरावर असून या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता उपलब्ध नाही. पक्का रस्ता नसल्याने राज्य परिवहन महामंडळाची बससुद्धा अजूनपर्यंत येथे पोहोचली नाही.  नागरिक सिरोंचा तालुका मुख्यलयी पायदळ येत असतात. गाव जंगलात असल्याने या घनदाट जंगलातून पायी येत असताना  वन्यजीवांच्या भीतीने जीव धोक्‍यात घालून यावे लागते. गावात वीजपुरवठा नसल्याने रात्री विषारी साप व विंचवासारख्या जिवांपासून जीव वाचवत जगावे लागत आहे. 

नशिबी अंधारच

 या गावात विजेची सोय होऊन अनेक वर्षे झाली. पण नागरिकांना अजूनही याचा लाभ मिळू शकला नाहीये. शासनाच्या दुर्लक्षामुळे येथे वीजपुरवठा  होत नाही. त्यामुळे प्रकाश बघणे या गावातील लोकांच्या नशिबात नाही. गावातील नागरिकांना अंधाराचा सामना करत जीवन जगावे लागत आहे. तसेच गावात वीजपुरवठा नसल्याने रात्री विषारी साप व विंचवासारख्या जिवांपासून जीव वाचवत जगावे लागत आहे. 

हाती फक्त निराशाच

निजमाबद-मंचेरीयाल-सिरोंचा-आमडेली-कोपेला-भोपलपट्टनम व छत्तीसगडमार्गे जगदलपूर, असे सर्वेक्षण होऊन महामार्ग झाला तरी गावातील समस्या सुटलेल्या नाहीत.  आता गावातून महामार्ग जात असल्याने गावाचा चेहरा-मोहरा बदलणार, असेही येथील ग्रामस्थांना वाटत होते. मात्र, हा महामार्ग सिरोंचा-असरअल्ली-भोपलपट्टनममार्गे जगदलपूर गेल्याने या दोन्ही गावांचा विकास रखडला आहे. 

निधीच पोहोचला नाही

शासनाकडून दरवर्षी ग्रामपंचायतीला गावविकासासाठी आमदार निधी, खासदार निधी, जिल्हा परिषदेकडून निधी, 14 व्या वित्त आयोगाकडून निधी, अशा विविध योजनांपासून ग्रामीण भागांतील गावांच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत असला, तरी तो गावांपर्यंत पोहोचत नाही. ग्रामीण भागांतील गावांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीत. शासनाच्या नियोजनशून्यतेमुळे येणारा निधी शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd T20I : अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर! दोन बदलांसह भारत मैदानावर उतरला, टॉस जिंकला

Uruli Kanchan Accident : उरुळी कांचनला स्कॉर्पिओ गाडीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, तीन जण जखमी

Latest Marathi News Live Update : नागपुरात रात्री दोन वेगवेगळ्या पोलीस स्टेशन हद्दीत दोन हत्येच्या घटना

Alpesh Bhoir: ठाकरे गटाचे ४ नगरसेवक गायब, जिल्हाप्रमुखांचा खळबळजनक आरोप; राजकारणात खळबळ

प्रवासात वेळ वाचवा! Google Maps मध्ये करा 'ही' सेटिंग, लेट होण्याचं टेन्शन नाही

SCROLL FOR NEXT