यवतमाळ : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एक मेपर्यंत कडक निर्बंध लागू करीत बाजारपेठेची वेळ कमी करण्यात आली. नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी निर्णय घेण्यात आला. मात्र, रोजच नागरिक अत्यावश्यकचा बहाणा करून बाजारपेठेत गर्दी करताना दिसत आहे.
यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठ सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. याच कालावधीत सर्वाधिक मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडताना दिसत आहेत. भाजीपाला, किराणा दुकानात सुरक्षित अंतर ठेवल्या जात नाही. विनाकारण फिरणाऱ्यांची "ऑन दि स्पॉट' कोविड टेस्ट काही तालुक्यात करण्यात आली. त्यामुळे नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मात्र, तरीही विनाकारण फिरणारे बेफिकीर होऊनच वागत आहेत.
अकरा वाजता बाजारपेठ बंद करण्याची वेळ असताना याच वेळी सर्वाधिक गर्दी उसळत आहे. परिणामी मुख्य रस्त्यांसह शहरातील अंतर्गत रस्त्यावर वाहतूक कोंडी होताना दिसते. अकराच्या ठोक्याला पोलिस वाहनाचा सायरन आवाज करीत ऐकायला मिळतो.
दुकाने बंद करण्यासह नागरिकांना घरी जाण्याचे आवाहन अकरा वाजता करण्यात येते. त्यानंतरही दुपारच्या सुमारास नागरिकांची विनाकारण रस्त्याने ये-जा सुरूच असते. बेफिकीर वागणुकीने आपण दुसऱ्या लाटेला निमंत्रण दिले आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत असले तरी नागरिकच हरताळ फासत असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.