Rahul Gandhi
Rahul Gandhi 
विदर्भ

नरेंद्र मोदींनी केला देशाचा विश्वासघात: राहुल गांधी

सकाळवृत्तसेवा

चंद्रपूर : देशातील एखादा उद्योगपती कोट्यवधी रुपये घेऊन देशाबाहेर पळून जाऊ शकतो, तर सरकारने देशातील शेतकऱ्यांचेही कर्जही माफ केले पाहिजे आणि हे सरकार सहज करू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा विश्वास तोडला, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच ते भिवंडी न्यायालयातही उपस्थित होते. आज (बुधवाऱ) ते नागपूरला रवाना झाले. तेथून ते चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी गेले. तेथे त्यांनी कृषि संशोधक आणि एचएमटी तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केले. त्यानंतर तेथून ते शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी पायी चालत गेले. 

शेतकऱ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले, ''जनतेचा पैसा बळकावून श्रीमंतांच्या खिशात भरला जात आहे. मोदी मूळ प्रश्न सोडून भलतेच मुद्दे समोर करतात. नेत्याचे काम देशाला विश्वास देण्याचे आहे, मात्र मोदी विश्वासघात करीत आहेत. रोजगार, शेतकरी प्रश्न, आरोग्य, शिक्षण महत्वाचे आहे, मात्र मोदींचे याकडे अजिबात लक्ष नाही. कर्जमाफीशी मोदींना काहीही देणेघेणे नाही. काही उद्योगपती त्यांची योग्य मार्केटिंग करीत असल्याने शेतकाऱ्यांकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. मोदी आपल्या मित्र उद्योगपतींसाठीच काम करीत आहेत. आम्ही सत्तेत येताच कर्नाटक आणि पंजाबमध्ये कर्जमाफी केली. एक वर्षाचे मनरेगाचे पैसे नीरव मोदी, विजय मल्ल्या घेऊन पळाले. एकही आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. बड्या श्रीमंत उद्योगपतीना कर्ज माफ केले, शेतकऱ्यांना नाही.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT